शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2024 17:50 IST

‘ऑरिक’मधून थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना थेट समृद्धी महामार्गाला लवकरच कनेक्ट मिळणार आहे. ऑरिक सिटीपासून समृद्धीला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत आंतरराष्ट्रीय औद्योगिक सुविधा असलेल्या ऑरिक सिटीचा शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यामध्ये पुढील दहा वर्षांत हजारो उद्योग येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या या डीएमआयसीच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या ९०० मीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे. तेथेच समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी येथील उद्योजकांची मागणी होती. उद्योजकांच्या मागणीची दखल घेत सन २०२२ मध्ये शासनाने ऑरिक शेंद्रा ते समृद्धी महामार्गादरम्यान ९०० मीटर रस्त्यासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले. यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि ऑरिक सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने निविदा प्रक्रिया राबवून समृद्धी महामार्गापर्यंत रस्ता उभारणे, इंटरचेंज उभारणे, टोल नाका उभारणे आदी कामासाठी ४१ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला. मागील १० महिन्यांत या रस्त्याचे काम झपाट्याने सुरू झाले. रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. शिवाय समृद्धी महामार्गावर चढणे आणि उतरण्यासाठी दोन वेगवेगळ्या लेन करण्यात आल्या आहेत. दोन्ही स्वतंत्र लेनजवळ स्वतंत्र टोलनाके उभारण्यात आली आहेत.

कनेक्टिव्हिटी औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचीबीड, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनचालकांना समृद्धी महामार्गावर जायचे असेल, तर त्यांना करोडी येथून अथवा हर्सूलमार्गे सावंगी येथील इंटरचेंजवरून समृद्धीवर कनेक्ट व्हावे लागते. हर्सूलमार्गे जायचे असेल तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तसेच करोडीवरून समृद्धीवर जाण्याऐवजी सर्वांत जवळचा आणि वाहतूक कोंडी नसलेला रस्ता म्हणून शेंद्रा येथील इंटरचेंज वाहनधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

शेतकऱ्यांनी रोखला होता वर्षभर रस्तासमृद्धी महामार्गासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांची चार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यात तेथील काही शेतकऱ्यांची घरेही संपादित करण्यात आली. यामुळे योग्य मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे वर्षभर या रस्त्याचे काम रोखले होते. एमआयडीसीचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याची तयारी दर्शविली. यानंतर शासनाने त्यांना ११ कोटी रुपयांचा मावेजा शेतकऱ्यांना दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी