शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2024 17:50 IST

‘ऑरिक’मधून थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना थेट समृद्धी महामार्गाला लवकरच कनेक्ट मिळणार आहे. ऑरिक सिटीपासून समृद्धीला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत आंतरराष्ट्रीय औद्योगिक सुविधा असलेल्या ऑरिक सिटीचा शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यामध्ये पुढील दहा वर्षांत हजारो उद्योग येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या या डीएमआयसीच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या ९०० मीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे. तेथेच समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी येथील उद्योजकांची मागणी होती. उद्योजकांच्या मागणीची दखल घेत सन २०२२ मध्ये शासनाने ऑरिक शेंद्रा ते समृद्धी महामार्गादरम्यान ९०० मीटर रस्त्यासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले. यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि ऑरिक सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने निविदा प्रक्रिया राबवून समृद्धी महामार्गापर्यंत रस्ता उभारणे, इंटरचेंज उभारणे, टोल नाका उभारणे आदी कामासाठी ४१ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला. मागील १० महिन्यांत या रस्त्याचे काम झपाट्याने सुरू झाले. रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. शिवाय समृद्धी महामार्गावर चढणे आणि उतरण्यासाठी दोन वेगवेगळ्या लेन करण्यात आल्या आहेत. दोन्ही स्वतंत्र लेनजवळ स्वतंत्र टोलनाके उभारण्यात आली आहेत.

कनेक्टिव्हिटी औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचीबीड, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनचालकांना समृद्धी महामार्गावर जायचे असेल, तर त्यांना करोडी येथून अथवा हर्सूलमार्गे सावंगी येथील इंटरचेंजवरून समृद्धीवर कनेक्ट व्हावे लागते. हर्सूलमार्गे जायचे असेल तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तसेच करोडीवरून समृद्धीवर जाण्याऐवजी सर्वांत जवळचा आणि वाहतूक कोंडी नसलेला रस्ता म्हणून शेंद्रा येथील इंटरचेंज वाहनधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

शेतकऱ्यांनी रोखला होता वर्षभर रस्तासमृद्धी महामार्गासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांची चार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यात तेथील काही शेतकऱ्यांची घरेही संपादित करण्यात आली. यामुळे योग्य मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे वर्षभर या रस्त्याचे काम रोखले होते. एमआयडीसीचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याची तयारी दर्शविली. यानंतर शासनाने त्यांना ११ कोटी रुपयांचा मावेजा शेतकऱ्यांना दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी