शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका; वीज बीलावरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 7:12 PM

Raju Shetty : नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे शेतकऱ्यावर अन्याय

पैठण ( परभणी ) : शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, खरिपातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांनी हात वर केले. अतिवृष्टीचे अनुदान खात्यात जमा झालेले नाही, सरकारने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले पन्नास हजाराचे अनुदान बँकेने जमा केले नाही, अशा प्रकारे नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. सर्व बाजूने शेतकऱ्यांचे येणे बाकी असताना वीज बिलाच्या देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करेल असा इशारा दिला. 

महावितरण वीजचोरी, गळतीची तूट शेतकऱ्यांच्या वीजबीलातून वसूल करते असा आरोप शेट्टी यांनी येवली केला. तसेच महावितरणने शेतकऱ्यांना आकारलेले कृषी पंपाचे बील चुकीचे व अवास्तव असल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या  सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे वसुल करण्या आधी महावितरणने बीलांची दुरूस्ती करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. ऊसाचा भाव घोषित करा म्हणून कारखान्यावर गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने दडपशाही केली, याचा निषेध करत या बाबत चौकशी करण्यात येईल असेही शेट्टी यांनी सांगितले. लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल. तेव्हा कोण दडपशाही करतो ते बघू असे आव्हानही शेट्टी यांनी दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे, बद्रीनाथ बोंबले, साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAurangabadऔरंगाबादagricultureशेतीmahavitaranमहावितरण