शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

वराहपालन शहराबाहेर करा; महापालिकेने पंधरा दिवसांची दिली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 19:33 IST

मनपा हद्दीत अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे वराहपालन सुरू केले आहे.

औरंगाबाद : शहरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये अनधिकृतपणे वराहपालन सुरू आहे. महापालिकेने वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत वराहांचा मुक्काम मनपा हद्दीबाहेर हलविण्याची सूचना केली आहे. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

मनपा हद्दीत अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे वराहपालन सुरू केले आहे. त्यांच्याकडून नागरी वसाहतींमध्ये नाल्यात वराह मोकाट सोडून देण्यात येतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा त्रास वाढला आहे. याविरोधात महापालिकेकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता या तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वराहपालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व वराहपालकांना त्यांच्या वराहांना मनपा हद्दीबाहेर इतरत्र हलविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शहरातील जवळपास सर्वच भागांत वराहपालन सुरू आहे. त्यात औरंगपुरा नाला, नारळीबाग नाला, मध्यवर्ती बसस्थानक, फाजलपुरा, बेगमपुरा, विद्यापीठ परिसर, शांतीपुरा, सातारा परिसर आदी भागांतील नाल्यांत मोकाट वराहांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरात दहा हजारांहून अधिक वराहमहापालिका हद्दीत सुमारे १० हजारांहून अधिक वराह असल्याचा अंदाज मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वराहांना शहराबाहेर हलविण्यासाठी याआधीही प्रयत्न झाले. मात्र, त्यावेळी वराह पालकांच्या संघटनेने महापालिकेसमोर उपोषण केले. आधी आम्हाला बाहेर जागा उपलब्ध करून द्या, मगच आम्हाला हलवा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर मनपाकडून वराह बाहेर हलविण्याची प्रक्रिया थांबली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका