शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

तोल जाणे, तळपायाला मुंग्या येणे दुर्लक्षित करू नका; ‘व्हिटामिन बी १२’ची तपासणी केली का?

By संतोष हिरेमठ | Updated: May 30, 2024 19:18 IST

लाल रक्तपेशींची निर्मिती करणे, मज्जासंस्था निरोगी बनविणे, यासाठी ‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वपूर्ण ठरते.

छत्रपती संभाजीनगर : ‘व्हिटॅमिन बी १२’ ची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, जर वारंवार थकवा येत असेल, अशक्तपणा वाटत असेल, चालताना तोल जात असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे. ‘व्हिटॅमिन बी १२’ तपासणी केली पाहिजे. त्याची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी औषधोपचारासह आहाराकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

‘व्हिटामिन बी १२’ आवश्यक का?लाल रक्तपेशींची निर्मिती करणे, मज्जासंस्था निरोगी बनविणे, यासाठी ‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वपूर्ण ठरते. अशक्तपणा, थकवा, आळस, पायाला मुंग्या येणे असा त्रास होत असेल तर तो या जीवनसत्त्वाअभावी असण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

‘व्हिटामिन बी १२’ तपासणी कधी करावी?अशक्तपणा, तोल जाणे, कंबरदुखी, तळपायाला मुंग्या येणे, धडधड वाढणे, चक्कर येणे असा त्रास होत असेल तर ‘व्हिटॅमिन बी १२’ ची तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.

काय काळजी घ्याल?‘व्हिटॅमिन बी १२’ मिळण्यासाठी आहार महत्त्वाचा ठरतो. ‘बी १२’ हे प्रामुख्याने मांसहारातून, तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते. त्याबरोबरच सोयाबीन, ब्रोकलीतूनही ते मिळते. त्यामुळे या पदार्थांचा समावेश आहारात करावा.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वाचे आहे. हे प्रामुख्याने मांसाहारातून मिळते. शाकाहारी व्यक्तींना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतून ते मिळते. ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेमुळे मुंग्या येणे, अशक्तपणा असा त्रास होताे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दर ६ महिन्याला तपासणी करून घ्यावी.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद