शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढा विसरता कामा नये

By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST

आखाडा बाळापूर : स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या लढ्यातील अनुभव व प्रत्येक क्षणाचे प्रवाह त्यांच्या प्रतिमेतून वाहतात. त्यांनी देशासाठी लढताना दु:खाचे क्षण झेलले.

आखाडा बाळापूर : स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या लढ्यातील अनुभव व प्रत्येक क्षणाचे प्रवाह त्यांच्या प्रतिमेतून वाहतात. त्यांनी देशासाठी लढताना दु:खाचे क्षण झेलले. त्यांच्या यातनांचा इतिहास तरुण पिढीने विसरता काम नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.फ.मुं. शिंदे यांनी केले. .आखाडा बाळापूर येथील जि.प. कन्या शाळेच्या सभागृहात स्वा.सै. क्रांतीवीर दीपाजी पाटील यांच्या अ.भा. परसवाळे यांनी काढलेल्या तैलचित्राच्या अनावरण झाले. ेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वा.सै. भीमराव बोंढारे होते. प्रमुख उपस्थिती साहित्यिक प्राचार्य सावंत, माजी शिक्षण सभापती संजय बोंढारे, सपोनि पंडित कच्छवे, प्रा. उत्तमराव सुर्यवंशी, साहित्यिक नरेंद्र नाईक, बबन शिंदे, महेश मोरे, जावळे, देवदत्त साने आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शिंदे बोलत होते. खुमासदार काव्यात्म शैलीतून शिंदे म्हणाले की, कळमनुरी तालुक्यातील दाती सारख्या ग्रामीण खेड्यातून स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व करत निजामास सळो की पळो करून सोडणारे क्रांतीवीर दीपाजी पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे. राष्ट्रभूमी त्यांचा श्वास होती. त्यांच्या लढ्याचे आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन विद्रोह करत आजच्या लबाडी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. पारतंत्र्यातून मुक्त व्हायला जे दु:ख सोसावे लागले. याचा इतिहास विसरता कामा नये; परंतु आजच्या पुढारी समाजव्यवस्थेने स्वातंत्र्य म्हणजे तोंड उघडण्याची सोय अशी परिभाषाच बदलून टाकली आहे. त्यामुळे कोणीही दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणार नाही. यावेळी त्यांनी समाजव्यवस्थेतील, शिक्षण, राजकारण, पोलिस, दारिद्र्य, बेकारी आदीवरही आपल्या काव्यात्म भाषणातून शिंदे यांनी प्रहार केला. प्रास्ताविक प्रा. उत्तम सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. देवदत्त साने यांनी केले. आभार शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले. (वार्ताहर)