शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'स्वतःला फसवू नका'; शिक्षिकेचे ‘ते’ एक वाक्य ठरले आयुष्यभराची शिदोरी : उदय चौधरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:38 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या ज्ञानशिदोरीतून घडलो

ठळक मुद्देशिक्षकाविना जिल्हाधिकारी झालो नसतो...इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील यश लक्षणीय ठरले.  

औरंगाबाद : शिक्षकांनी संस्काराच्या रूपाने केलेले मार्गदर्शन आयुष्यभर ज्ञानशिदोरी म्हणून एक महत्त्वपूर्ण ठेवा असतो. माझ्या आजवरच्या प्रवासात शिक्षकांचे योगदान बहुमूल्य असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला प्रत्येक टप्प्यावर योग्य शिक्षक मिळाले. प्राथमिक शाळेपासून, माध्यमिक शाळेपर्यंत सर्व शिक्षक चांगलेच मिळाले. शिक्षक दिनानिमित्त सांगावेसे वाटते की, संस्कृतच्या शिक्षिका मीरा फडणीस यांची आठवण माझ्याकडे एक ठेवा आहे. त्यांनी जे सांगितले, ते आजही मनात आहे, जेव्हा तुम्ही कोणत्याही पदावर काम कराल, त्यावेळी तुम्ही घरच्यांना फसवू शकाल, इतरांना फसवाल; परंतु स्वत:च्या मनाला फसवू शकणार नाही. त्यामुळे कुठलीही कृती करताना कितीही गुपचूप काही केले तर अंतर्मनातील ईश्वर तुम्हाला बघत असतो. तेच वाक्य आजवर माझ्या मनात कायम आहे.

कुठलेही गैरकृत्य माझ्या हातून होण्यापूर्वी ते मार्गदर्शन आधी माझ्या समोर येते. १८ ते १९ वर्षांपासून मी याच वाक्यावर माझी वाटचाल केली आहे. हेच माझ्या लक्षात आहे. आपले मन कधीही आपल्याला माफ करू शकणार नाही. अशी चूक माझ्याकडून तरी आजवर झालेली नाही. जिल्हाधिकारी चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण सु.ग. देवकर प्रा.विद्यालय, जळगाव, आणि माध्यमिक लालजी नारायण विद्यालय, जळगाव येथे झाले. त्यानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातच त्यांनी आयएएससाठी प्रशिक्षण घेतले.

आयपीएस अधिकाऱ्याचे मित्ररूपी मार्गदर्शनशिक्षक मित्र आयएएसच्या अभ्यासातून झाले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीत शिक्षक, प्राध्यापक असे कुणी नसते. एक मात्र त्या ठिकाणी झाले. रवी पाटील म्हणून आयपीएस अधिकारी आहेत. २००४ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते सध्या सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मित्रत्वाच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे आयएएस होणे शक्य झाले.

माझी आई विसरलेली नाहीकुलकर्णी नावाच्या शिक्षिकेने सांगितले होते, तुला माहिती नाही, तुझा मुलगा काय आहे. आम्हाला माहिती आहे, तू बघ तुझा मुलगा जिल्ह्यात पहिला येणार. कौटुंबिक परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे आईला त्यांचे खूप नवल वाटले नाही. माझे परीक्षेत पहिले येणे आईला सामान्यच वाटले. मात्र, पुढे वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाल्यानंतर शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व समजले. कुलकर्णी यांचा शब्द अजूनही आई विसरलेली नाही. 

शाळकरी जीवनातील क्षणमी प्राथमिक शाळेत असताना आमच्या शिक्षिका उज्ज्वला कुलकर्णी होत्या. इयत्ता चौथीमध्ये त्यावेळी स्कॉलरशिपच्या परीक्षा होत्या. परीक्षा झालेली होती. स्कॉलशिप परीक्षेच्या निकालापूर्वी शिक्षिका कुलकर्णी आईला म्हणायच्या उदय काय आहे, हे तुला महिती नाही. आम्हाला माहिती आहे. त्यावेळी माझ्या आईला असे वाटायचे हा वर्गात व शाळेत हुशार आहे, काही तरी काम धंदा करील.

( शब्दांकन : विकास राऊत ) 

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Dayशिक्षक दिनAurangabadऔरंगाबाद