शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

'सरकार वाचविण्यासाठी जेवढी धडपड करताय तेवढी सर्वसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 12:56 IST

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

ठळक मुद्देदरम्यान, महाले यांनी औरंगाबाद घाटी रुग्णालयातील काही फोटोही शेअर केले आहेत. 

औरंगाबाद - राज्यात विधानसभा अधिवेशनापूर्वीपासूनच विरोधक हात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर, सचिन वाझे अन् मनसुख हिरेन प्रकरणावरुन राज्य सरकार कोडींत सापडले असताना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून राजकीय भूकंप घडवला. त्यामुळे, विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे संकटही चांगलच वाढलय. यावरुनच, भाजपा आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय. 

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, विरोधकांकडून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. भाजपा नेत्यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. राज्यातील काही नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केलीय. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. आता, भाजपा नेत्या आणि चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील, असे महाले यांनी म्हटलंय. दरम्यान, महाले यांनी औरंगाबाद घाटी रुग्णालयातील काही फोटोही शेअर केले आहेत. 

दरम्यान, एकीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना दुसरीकडे कोरोनानेही डोकं वर काढलंय. कोरोनाची सर्वाधिक वाढ असलेल्या देशातील 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे, कोरोना आणि दुसरीकडे विरोधकांची आक्रमक भूमिका या दोन्हींना तोंड द्यायचं काम सरकारला करावे लागत आहे.  

टॅग्स :MLAआमदारAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार