शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

'सरकार वाचविण्यासाठी जेवढी धडपड करताय तेवढी सर्वसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 12:56 IST

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

ठळक मुद्देदरम्यान, महाले यांनी औरंगाबाद घाटी रुग्णालयातील काही फोटोही शेअर केले आहेत. 

औरंगाबाद - राज्यात विधानसभा अधिवेशनापूर्वीपासूनच विरोधक हात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर, सचिन वाझे अन् मनसुख हिरेन प्रकरणावरुन राज्य सरकार कोडींत सापडले असताना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून राजकीय भूकंप घडवला. त्यामुळे, विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे संकटही चांगलच वाढलय. यावरुनच, भाजपा आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय. 

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, विरोधकांकडून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. भाजपा नेत्यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. राज्यातील काही नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केलीय. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. आता, भाजपा नेत्या आणि चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील, असे महाले यांनी म्हटलंय. दरम्यान, महाले यांनी औरंगाबाद घाटी रुग्णालयातील काही फोटोही शेअर केले आहेत. 

दरम्यान, एकीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना दुसरीकडे कोरोनानेही डोकं वर काढलंय. कोरोनाची सर्वाधिक वाढ असलेल्या देशातील 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे, कोरोना आणि दुसरीकडे विरोधकांची आक्रमक भूमिका या दोन्हींना तोंड द्यायचं काम सरकारला करावे लागत आहे.  

टॅग्स :MLAआमदारAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार