शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा -शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:04 IST

वेरूळ येथील अतिरुद्र अभिषेक सोहळ्याची थाटात सांगता

वेरूळ : वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा, असा उपदेश जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी येथे केला. अधिक मासानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात ४ जूनपासून सुरू असलेल्या अतिरुद्र अभिषेक सोहळ्याची सांगता शुक्रवारी थाटात करण्यात आली.यंदा दर्भतीर्थाने (कुश) पाच दिवस घृष्णेश्वरास अतिरुद्र अभिषेक करण्यात आला. यामुळे पाच दिवस गाभारा दर्शन बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना या काळात सभामंडपातूनच दर्शन घ्यावे लागले. शुक्रवारी करवीर पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, समाजरत्न श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, विद्यावामदेवानंद तीर्थस्वरूप टाकास्वामी वेरूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता झाली.यावेळी शंकराचार्यांनी सांगितले की, अधर्माने माणूस वागला की, पापाचा संचय वाढतो, पापाचे दुसरे नाव म्हणजे अधर्म आणि दु:ख आहे. त्यामुळे वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा, यामुळे पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा उदय होतो व सुख मिळते, असे अनेक दाखले देत त्यांनी भाविकांना उपदेश केला.अतिरुद्र अभिषेकाच्या काळात २५१ ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात घृष्णेश्वर महादेवास अतिरुद्र या पूजा प्रकारात १४,६४१ अभिषेक म्हणजे ११ महारुद्र संपन्न झाले. अखंडित चाललेल्या या अतिरुद्रास तीन तासांकरिता एका वेळी चाळीस ब्रह्मवृंद मंत्रपठण करीत होते. यावेळी तांदळाचा सर्वतोभद्र मंडल बनविण्यात आला होता.सांगतेप्रसंगी गरीब, शेतकरी, दिव्यांग बांधवांना शिधा व वस्त्र वाटप करण्यात आले. यावेळी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, राजेंद्र पवार, विष्णू महाराज, शिवाभाऊ अंगूलगावकर, देवस्थान अध्यक्ष दीपक शुक्ला, अतिरुद्र अध्यक्ष परेश पाठक, कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर, मुख्य पुजारी रवी पुराणिक, संजय वैद्य, योगेश टोपरे, शशांक टोपरे, सुनील शास्त्री, सुनील विटेकर, रावसाहेब शास्त्री यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविक अ‍ॅड. मिलिंद जोशी यांनी केले. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक