शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 18:15 IST

‘एमएसआरडीसी’कडे ४१.१४ कोटी आगाऊ रक्कम जमा

- विजय सरवदेऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ( DMIC ) कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे. दरम्यान, जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी एमआयडीसीला एकूण ८ एकर भूसंंपादन करावे लागणार आहे. तथापि, समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमआयडीसीकडून ४१.१४ कोटींची आगाऊ रक्कम प्राप्त झाली आहे.

प्राप्त रकमेतून ‘एमएसआरडीसी’कडून समृद्धी महामार्गावर केवळ इंटरचेंज उभारले जाणार आहे. इंटरचेंजपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत जवळपास ९०० मीटर लांबीचा रस्ता एमआयडीसीला करावा लागणार आहे. इंटरचेंजसाठी ४ एकर आणि रस्त्यासाठी ४ एकर असे एकूण ८ एकर भूसंपादन एमआयडीसीला करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना एमएसआरडीसीने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा पाच पट मावेजा दिला होता. तेवढाचा मावेजा एमआयडीसीने द्यावा, या मुद्यावर शेतकरी अडले आहेत. तथापि, एमआयडीसीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असून त्यावर हरकती, खुलासे मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘डीएमआयसी’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर या शहराची दळणवळणाची सुविधा उत्तम असायला हवी. यासाठी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली पाहिजे. येथून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी रेल्वेसेवा व रस्त्याची सुविधा असायला हवी. दुसरीकडे औरंगाबादेतून जाणाऱ्या ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी असावी, अशी उद्योग संघटनांची अपेक्षा आहे.

वाहतुकीला अडथळा येणार नाही‘एमआयडीसी’कडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथून पुढे तीन ते चार महिन्यांत समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीचे काम पूर्ण होईल. तत्पूर्वी, जर या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली, तरीही कनेक्टिव्हिटीच्या कामाचा अडथळा येणार नाही. मात्र, इंटरचेंज व एमआयडीसीच्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच समृद्धी महामार्गावरून ‘डीएमआयसी’ची वाहतूक सुरू होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबादAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी