शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

 औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ६५० पाण्याच्या टाक्यांचे वितरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:51 IST

टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ११७६ गावे आणि ३७६ वाड्यांमध्ये १५३९ टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे. साठवण टाक्यांतून पिण्याचे पाणी वितरित करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला मंत्रालयातून देण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर आणि बुलडाणा या जिल्ह्यांत १००० टाक्यांचे वितरण होणार आहे. सीएसआरअंतर्गत टंचाईग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक/फायबरच्या पाणी साठवण टाक्यांमध्ये टँकरचे पाणी टाकण्यात येईल. साठवण टाकी ऊंच कठड्यावर बसविण्यात येईल. प्रत्येक टाकीसाठी २ ते ५ नळ जोडण्या करण्याबाबत शासनाने प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीने सीएसआरअंतर्गत १ हजार साठवण टाक्या पुरविण्याचे मान्य केले आहे. सदरील टाक्या तहसीलदार पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. औरंगाबादेतील एका कंपनीकडून सदरील टाक्या पुरविल्या जातील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद