शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

जगभरातील धर्मांवर आधारित हिंसेमुळे व्यथित - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 06:43 IST

मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा.

औरंगाबाद : मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा. या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत. परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडविली जात आहे, याचे मला दु:ख होते, असे जागतिक धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांचे शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथे आगमन झाल्यानंतर शनिवारी सकाळी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भारताच्या २६०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन विचारात दिलेल्या शिकवणीनुसार अहिंसा आणि करुणा याला महत्त्व दिल्यामुळे मानव मानवातील द्वेषाला इथे थारा नाही. परंतु सध्या जगभरात धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसा घडविली जात आहे. याबाबतची दृश्ये टीव्हीवर पाहताना मला अतिव दु:ख होते, असे सांगून दलाई लामा म्हणाले की, धर्माच्या नावाखाली प्रामुख्याने ख्रिश्चन, इस्लाम यांना त्रास दिला जातो. माझ्या दृष्टीने व्यथित करणारी बाब म्हणजे बर्मामध्ये बौद्धांकडून मुस्लिमांना तर इस्रायलमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनांना तर इजिप्तमध्ये शिया-सुन्नीवरून धार्मिक हिंसा घडविली जात आहे. मोहम्मद पैगंबरांनी सहाशे वर्षांपूर्वी करुणा आणि शांततेची शिकवण दिली. आजही तेच मोहम्मद आहेत. त्यांची तीच करुणा आहे आणि तीच पाच वेळा केली जाणारी प्रार्थना आहे. तरीही ही हिंसा का, याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी ज्या-ज्या देशांत जातो तेथे करुणा आणि अहिंसेचे महत्त्व सांगत असतो.कारण कोणताही धर्म माणसाला मारण्याची परवानगी देत नाही. या पार्श्वभूमीवरभारतातील २६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची आठवण होते. या संस्कृतीचा प्रचार करण्याची गरज आहे. मी स्वत:ला भारतीय मानतो. कारण मी गेल्या साठ वर्षांपासून या देशात राहतो.मला एका फ्रेंच पत्रकाराने विचारले असता मी त्यांना सांगितले होते, माझे मस्तिष्क भारतातील नालंदा विश्वविद्यालयाच्या तत्त्वज्ञानाने भरलेले आहे, तर माझे भरण-पोषण या देशातील डाळ, चपातीने केले आहे. मी भारताचा पुत्र आहे (आय अ‍ॅम सन आॅफ इंडिया), असेही दलाई लामा म्हणाले.केवळ प्रार्थनेतून माणूस घडणार नाहीआधुनिक शिक्षणातून भौतिकवादी माणूस घडवला जातो आहे. त्यांच्यामध्ये करुणा आणि अहिंसेचा अभाव दिसून येतो. भारतीय समाजाचेही तसेच झाले आहे. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा आणि अहिंसा मानवतावाद यावरील भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानातील शिक्षण देण्याची गरज आहे. केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणूस घडणार नाही. माणसाला धर्मातील मानवी कल्याणाची मूल्ये अंगीकारावी लागतील. केवळ ‘बुद्धम शरणम् गच्छामि’ म्हणून हे मूल्य प्रत्यक्षात येणार नाही.- दलाई लामा

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबाद