शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील धर्मांवर आधारित हिंसेमुळे व्यथित - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 06:43 IST

मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा.

औरंगाबाद : मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा. या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत. परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडविली जात आहे, याचे मला दु:ख होते, असे जागतिक धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांचे शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथे आगमन झाल्यानंतर शनिवारी सकाळी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भारताच्या २६०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन विचारात दिलेल्या शिकवणीनुसार अहिंसा आणि करुणा याला महत्त्व दिल्यामुळे मानव मानवातील द्वेषाला इथे थारा नाही. परंतु सध्या जगभरात धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसा घडविली जात आहे. याबाबतची दृश्ये टीव्हीवर पाहताना मला अतिव दु:ख होते, असे सांगून दलाई लामा म्हणाले की, धर्माच्या नावाखाली प्रामुख्याने ख्रिश्चन, इस्लाम यांना त्रास दिला जातो. माझ्या दृष्टीने व्यथित करणारी बाब म्हणजे बर्मामध्ये बौद्धांकडून मुस्लिमांना तर इस्रायलमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनांना तर इजिप्तमध्ये शिया-सुन्नीवरून धार्मिक हिंसा घडविली जात आहे. मोहम्मद पैगंबरांनी सहाशे वर्षांपूर्वी करुणा आणि शांततेची शिकवण दिली. आजही तेच मोहम्मद आहेत. त्यांची तीच करुणा आहे आणि तीच पाच वेळा केली जाणारी प्रार्थना आहे. तरीही ही हिंसा का, याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी ज्या-ज्या देशांत जातो तेथे करुणा आणि अहिंसेचे महत्त्व सांगत असतो.कारण कोणताही धर्म माणसाला मारण्याची परवानगी देत नाही. या पार्श्वभूमीवरभारतातील २६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची आठवण होते. या संस्कृतीचा प्रचार करण्याची गरज आहे. मी स्वत:ला भारतीय मानतो. कारण मी गेल्या साठ वर्षांपासून या देशात राहतो.मला एका फ्रेंच पत्रकाराने विचारले असता मी त्यांना सांगितले होते, माझे मस्तिष्क भारतातील नालंदा विश्वविद्यालयाच्या तत्त्वज्ञानाने भरलेले आहे, तर माझे भरण-पोषण या देशातील डाळ, चपातीने केले आहे. मी भारताचा पुत्र आहे (आय अ‍ॅम सन आॅफ इंडिया), असेही दलाई लामा म्हणाले.केवळ प्रार्थनेतून माणूस घडणार नाहीआधुनिक शिक्षणातून भौतिकवादी माणूस घडवला जातो आहे. त्यांच्यामध्ये करुणा आणि अहिंसेचा अभाव दिसून येतो. भारतीय समाजाचेही तसेच झाले आहे. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा आणि अहिंसा मानवतावाद यावरील भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानातील शिक्षण देण्याची गरज आहे. केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणूस घडणार नाही. माणसाला धर्मातील मानवी कल्याणाची मूल्ये अंगीकारावी लागतील. केवळ ‘बुद्धम शरणम् गच्छामि’ म्हणून हे मूल्य प्रत्यक्षात येणार नाही.- दलाई लामा

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबाद