शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तिकडे जन्मस्थळावरून वाद; इकडे मुस्लिमांनी पुढाकार घेत हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 12:30 IST

हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरचा आदर्श, स्वखर्चाने गावातील हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार

- महेमूद शेख

वाळूज महानगर (औरंगाबाद) : गावात एकही हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरच्या ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. बुधवारी (दि.१) गावात साधू-संतांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

सध्या देशात मंदिर-मस्जिदवरून ठिकठिकाणी भांडणाच्या घटना घडत असून, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्यामुळे एकता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही ग्रामीण भागात हिंदू-मुस्लीम समाज आजही एकोप्याने राहत आहे. वाळूजपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूरची लोकसंख्या ३५०० हजारांच्या आसपास आहे. या गावात मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास २८००, दलित समाजाची ४००, गोसावी समाजाची ३०० एवढी असून गावात दोन शीख कुटुंबीयाचेही वास्तव्य आहे.

विशेष म्हणजे, या मुस्लीम बहुल गावात एकही हिंदू वास्तव्यास नाहीत. गावात हनुमान मंदिराची आजघडीला पूर्णपणे पडझड झाल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय सरपंच नासेर पटेल यांनी घेत मित्र-मंडळी व ग्रामस्थांची मते जाणून घेतली. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सर्वांनी सहमती दर्शविल्यानंतर सरपंच नासेर पटेल व केसापुरीचे काकासाहेब फांदाडे यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी महिन्यात जीर्णोद्धाराचे काम सुरू केले व ते आता पूर्ण झाले आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उपसरपंच मजीद पटेल, ग्रामविकास अधिकारी ए.आर. राठोड, सब्जर पटेल, अय्युब पठाण, लाल पटेल, दर्शनसिंग संधू, संजय घाडगे, दीपक खरात, हाशम पटेल आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

आज हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठानारायणपुरात जीर्णोद्धार करण्यात आलेल्या हनुमान मंदिरात उद्या बुधवार (दि.१) सकाळी १० वाजता पुजारी नंदू गुरुजी वाळूजकर यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री यांचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच नासेर पटेल, काकासाहेब फांदाडे व ग्रामस्थांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक