शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

स्थायी समितीतील वाद ‘मातोश्री’पर्यंत; १६ पैकी १५ सदस्यांचा बंडाचा झेंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:31 IST

स्थायी समितीमधील १६ पैकी १५ सदस्यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. त्यात सेनेच्या ५ सदस्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद : स्थायी समितीमधील १६ पैकी १५ सदस्यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. त्यातील सेनेच्या ५ सदस्यांचा समावेश आहे. बंड थोपविण्यासाठी सेना सदस्यांवर पक्षीय दबाव टाकण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. प्रकरण अधिक पेटण्यापूर्वी सेना सदस्य स्थायीमधील वाद थेट ‘मातोश्री’वर नेणार आहेत. त्यामुळे सभापती राजू वैद्य यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.

स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी महिनाभरापूर्वी ३६ कोटी रुपयांचा एक ठराव मंजूर केला. या ठरावात वाळूज येथील मायोवेसल कंपनीला कचरा प्रक्रियेचे काम देण्यात आले. हा ठराव ऐनवेळी सभागृहात आणून मंजूर करण्यात आला. या ठरावावर अजिबात चर्चा झाली नाही. ज्या कंपनीला मनपा प्रशासन काम देणार आहे, त्या कंपनीने देशात कुठे-कुठे चांगले काम केले याचा अहवाल द्यावा, एवढीच सदस्यांची रास्त मागणी आहे. मनपा प्रशासन आणि सभापती या मागणीकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे स्थायी समितीमधील सेनेचे पाच, एमआयएमचे चार आणि चार भाजप-अपक्षांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. 

सोमवारी खा. चंद्रकांत खैरे यांनी स्थायीमधील सेनेच्या ५ सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आता सर्व १५ सदस्य नगरसचिव दिलीप सूर्यवंशी यांना निलंबित करा, सभापतींचे अधिकार काढा, अशी मागणी करीत आहेत. दोन्ही मागण्या नियमाला अनुसरून नाहीत. सभापतींवर अविश्वास ठराव आणता येऊ शकतो का? याचीही चाचपणी सदस्यांनी केली. मात्र, कायद्यात अशी तरतूदच नाही. त्यामुळे सेनेचे पाच सदस्य न्यायासाठी थेट मातोश्रीवर धाव घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

चित्र बदलणार नाहीस्थायी समितीमधील १५ सदस्यांनी यापुढे एकाही बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजू वैद्य एकाकी पडले आहेत. त्यांनी बैठक आयोजित केली तरी कोणताच निर्णय घेता येणार नाही. स्थायीत कोणताही ठराव मंजूर करण्यासाठी किमान ७ सदस्यांचे बहुमत असणे आवश्यक आहे. सेनेच्या पाच सदस्यांनी बंडातून माघार घेतली तरी उर्वरित १० सदस्य ठाम राहणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv Senaशिवसेना