शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नगर, नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याच्या ‘जलसंपत्ती नियमन’च्या निर्देशाची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:51 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्दे - ‘जायकवाडी’चे हक्काचे पाणी अडवले - पाण्याच्या विसर्गात खंड, हक्काचे पाणी पोहोचलेच नाही

औरंगाबाद : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्यक्षात निर्देश आणि आदेशानुसार पाणी सोडण्याऐवजी वरच्या भागांत जायकवाडीचे पाणी अडविण्यात आले, बंधारे भरण्यात आले आणि पाण्याच्या विसर्गात खंड पाडला. या प्रकाराची जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पावर जलसंकट निर्माण झाले. जायकवाडीच्या वरची नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे या धरणांतून जायकवाडीसाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्याची मागणी झाली. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ऊर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिले; परंतु नगर, नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विविध माध्यमांतून विरोध झाला. १५ दिवसांच्या विविध घडामोडी आणि संघर्षानंतर वरच्या धरणांतून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. जायकवाडीसाठी १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणांतून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद झालेला आहे. यात निळवंडे धरणातून  नियोजित पाणी सोडण्यापूर्वीच विसर्ग बंद करण्यात आला आहे. जायकवाडीच्या हक्काचे हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे (रोटेशन) अडवण्यात आले आहे.  ८.९९ पैकी जायकवाडीच्या वाट्याला किमान ६ टीएमसी पाणी येणार होते; परंतु केवळ ३.८० टीएमसी पाणी आले. २.२० टीएमसी पाण्याची तूट आहे. कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे या कारणांबरोबर पाण्याची थेट चोरी करण्यात आल्याने हक्काचे पाणी जायकवाडीत पोहोचले नाही. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

संनियंत्रण यंत्रणा कागदावरचजायकवाडीत ज्या-ज्या धरणांतून पाणी सोडले जाणार आहे, तेथे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नोंद ठेवण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. जायकवाडीत प्रत्यक्षात आलेल्या पाण्याचे प्रमाण पाहता ही यंत्रणा केवळ कागदावरच कार्यरत होती, अशी ओरड होत आहे. 

दखल घ्यावीजायकवाडीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्य ठेवले पाहिजे होते; परंतु विसर्ग मध्येच थांबतो. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी होती. या सगळ्या संदर्भात प्राधिकरणाने दखल घेतली पाहिजे. - प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

न्यायालयात दाद मागणारन्यायालयाच्या आदेशानंतरही जायकवाडीसाठी वरच्या धरणांतून ठरल्याप्रमाणे पाणी मिळालेले नाही. जायकवाडीत किमान ६.३ टीएमसी पाणी येणे अपेक्षित होते; परंतु नगर, नाशिक जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावापुढे सरकार झुकले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली जाईल, असे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार