शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

नाईलाजाने राज्य सोडू...वाळूज येथील उद्योजकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहे, येथील उद्योजक ग्रामपंचायत कर भरत असतात. मात्र, ...

ठळक मुद्देमनमानी करवसुली : ग्रामपंचायतीच्या दादागिरीविरोधात उद्योजक एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहे, येथील उद्योजक ग्रामपंचायत कर भरत असतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींनी दादागिरी करीत उद्योजकांकडून मनमानी पद्धतीने अवास्तव कर वसुली करणे सुरूकेले आहे. एवढेच नव्हे तर आता थकीत कर वसुलीसाठी या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक व पदाधिकाºयांनी थेट कंपन्यांमध्ये घुसून कॉम्प्युटर अन्य साहित्य जप्त करणे सुरू केले आहे. या दादागिरीविरोधात सर्व उद्योजक एकवटले आहे. प्रशासनाने या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही व ग्रामपंचायतींची अशीच दादागिरी सुरूराहिली, तर येत्या काळात आम्हाला नाईलाजाने महाराष्ट्र सोडावा लागेल व शेजारी राज्यात उद्योग सुरू करावे लागतील, असा इशारा उद्योजकांनी दिला.यासंदर्भात आयोजित पत्र परिषदेत चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (मासिआ)चे अध्यक्ष सुनील किर्दक व वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशन (डब्ल्यूआयए) चे अध्यक्ष वसंत वाघमारे यांची प्रमुख उपस्थितीहोती.सुनील किर्दक यांनी सांगितले की,जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या किर्दक आॅटोकॉपमध्ये दुपारी ४ वा. ग्रामपंचायतचे लोक आले त्यांनी कर वसुलीसाठी आॅफिसमधील कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअरचे सामान सर्व जप्त करून ट्रॅक्टरमध्ये टाकले.ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार कंपनीकडे १ लाख ७० हजारांची कर थकबाकी होती. मात्र, त्यासाठी कंपनीतील सुमारे २५ लाखांपेक्षा अधिकचे सामान ग्रामपंचायतच्या लोकांनी जप्त केले. कलम १२५ नुसार वाटाघाटी करून तोडगा काढण्याचा अधिकार आहे; पण ग्रामपंचायत तसे करीत नसल्याने थकबाकी दिसून येत आहे, अशा प्रकारे दादागिरी करून जप्ती करण्याचा प्रकार पहिल्यांदाच देशात घडला आहे. ही घटना निंदनीय आहे. यामुळे सर्व उद्योजक घाबरले आहेत, अशा असुरक्षित वातावरणात आम्ही उद्योग करू शकणार नाही, असे सांगत किर्दक पुढे म्हणाले की, औरंगाबादेतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना ग्रामपंचायत करापोटी असा त्रास दादागिरी सहन करावी लागत आहे, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्ही येथील उद्योग बंद करून दुसºया राज्यात उद्योग सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला.ग्रामपंचायत कर रद्द करावासीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले की, उद्योगांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (म.औ.वि.म.) कडून भूखंड दिले जातात. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, पथदिवे आदी मूलभूत सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जातात. त्यासाठी उद्योगांकडून सेवाशुल्क वसूल केले जाते. मग ग्रामपंचायत कर कशासाठी आकारलाजातो.विशेष म्हणजे ग्रामपंचायत कोणत्याही सुविधा देत नाहीत. या ग्रामपंचायत कराआड दादागिरी, मनमानी कर वसुली वाढली असून, याचा राज्यातील सर्व उद्योगांना त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण देशात जीएसटी एकच करप्रणाली लागू झाल्याने आता ग्रामपंचायत कर रद्द झाला पाहिजे तरच राज्यात भविष्यात उद्योग टिकून राहतील.उद्योजकांच्या मागण्याजीएसटी लागू झाल्याने ग्रामपंचायत कर रद्द करावा.कर भरण्यासाठी एक खिडकी योजना असावी.एमआयडीसी सेवा पुरविते तिथेच कर भरण्याची मुभा असावी.संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत करात सुसूत्रता असावी.अ,ब,क,ड या दर्जानुसार ग्रामपंचायतीने कर आकारावा.