शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आजारांचे नव्हे, निदानाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:10 IST

:रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे उद््घाटन

औरंगाबाद :रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे. त्यामुळेवेगवेगळ्या रक्तविकारांवर आणि जनुकीय आजारांवर, बदलणाऱ्या निदान तंत्रांवर व विविध उपचार पद्धतींवर फिजिशियन असोसिएशन आॅफ औरंगाबाद, औरंगाबाद आॅबस्टेट्रिक अ‍ॅण्ड गायनाकॉलॉजीकल सोसायटी आणि कमलनयन बजाज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे शनिवारी (दि.३०) उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी सी. पी. त्रिपाठी, लंडन येथील डॉ. आशुतोष वेचलेकर, डॉ. रोशन कोलाह, डॉ. सुमित गुजराल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.परिषदेस डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. व्यंकटेश एकबोटे, डॉ. अलका एकबोटे, डॉ. प्रांजळ कुलकर्णी, डॉ. गजानन पदमवार, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या शहर शाखेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख, सचिव डॉ. मनीषा काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. आनंददीप अग्रवाल, डॉ. सुमित भट, डॉ. हेमंत कोंकडकर, डॉ. राजेंद्र खडके, डॉ. रवींद्र पटवाडकर, डॉ. तुषार मुळे, डॉ. राजेश सावजी, डॉ. सी. पी. भाले, डॉ. शुभांगी शेटकर आदी उपस्थित होते.डॉ. समीर मेलेनकरी, डॉ. अभिजित गणपुळे यांनी रक्ताच्या कर्करोगाच्या उपचाराविषयी, डॉ. वेचलेकर यांनी विविध रक्तविकारांवर, डॉ. कोलाह यांनी थॅलेसेमियासारखे आजार कशा प्रकारे टाळता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन केले.ब्लड कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावररक्ताचा कर्करोग बरा करण्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांमध्ये आढळणाºया कर्करोगात रक्ताचा कर्करोग हा दुसºया क्रमाकांवर आहे. टार्गेटेड थेरपीद्वारे केवळ खराब पेशी नष्ट केल्या जातात. लहान मुले असो की मोठी व्यक्ती, रक्ताचा कर्करोग झालेले ७० टक्के रुग्ण बरे होतात, असे डॉ. व्यंकटेश एकबोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरAurangabadऔरंगाबाद