शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नकोशी समजून टाकून दिलेले बाळ ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 14:49 IST

औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी त्याच संघर्ष सुरू आहे. पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे समजून सुनीता साळुंके या मातेनेच नवजात बाळाला दि. ३० रोजी शेतात फेकून दिले होते.  मात्र  पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने सांगितले. या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वार्ड क्रं. २५ येथे उपचार सुरू आहेत. बाळाला जंतुसंसर्ग झाला असून त्याला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले आहे. बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. शिल्पा पवार, डॉ. अमृता मदने, डॉ. अभिषेक जैन, डॉ. उबेदऊर रहेमान  ...

औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी त्याच संघर्ष सुरू आहे.

पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे समजून सुनीता साळुंके या मातेनेच नवजात बाळाला दि. ३० रोजी शेतात फेकून दिले होते.  मात्र  पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने सांगितले.

या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वार्ड क्रं. २५ येथे उपचार सुरू आहेत. बाळाला जंतुसंसर्ग झाला असून त्याला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले आहे. बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. शिल्पा पवार, डॉ. अमृता मदने, डॉ. अभिषेक जैन, डॉ. उबेदऊर रहेमान  आणि  परिचारिका  बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

याविषयी सांगताना बाळाचे वडील अशोक साळुंके म्हणाले की, दि. ३० सप्टेंबररोजी सुनीता यांना पोटात दुखत असल्याने  त्या शेतात शौचास गेल्या.  त्याचठिकाणी त्यांची प्रसूती झाली. पण भेदरलेल्या अवस्थेत त्या बाळाला तिथेच टाकून आल्या आणि चक्कर येत होती म्हणून  घरी येऊन  झोपल्या.  गावात चर्चा सुरू झाली असता, तिने हे सत्य सांगितले. हे अर्भक आमचेच असून आम्ही कोणत्याही  चौकशीस तसेच चाचणीस  तयार आहोत,  असेही  अशोक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यvaijapur-acवैजापूर