शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

निराशाजनक ! परभणी- मनमाड दुहेरीकरणास रेल्वेकडून ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 17:29 IST

पूर्ण क्षमतेने वापर नसल्याचे कारण देत परभणी- मनमाड दुहेरीकरणास नकार दिला,  मात्र मनमाड ते औरंगाबाद दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड ( Parbhani - Manmad Railway Track ) या २९१ कि. मी. अंतर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे (Railways gives 'red signal' to Parbhani-Manmad doubling). या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचे उत्तर लोकसभेतील प्रश्नोत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.

मात्र त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. लोकसभेत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बुधवारी परभणी-मनमाड दुहेरीकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे. रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने दुहेरीकरणाला प्राधान्य देते. सध्या परभणी-मनमाड मार्गाचे पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने या मार्गाच्या दुहेरीकरणाची गरज नसल्याचे उत्तर देण्यात आले.

दुहेरीकरण का गरजेचे?दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल; शिवाय रेल्वेचा वेग वाढेल. एकेरी मार्गावर एखाद्या रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे कायमचा थांबेल.

‘दमरे’च्या अधिकाऱ्यांची नकारात्मकतामागील एका दशकापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक निर्णयामुळे परभणी-मनमाड मार्ग दुहेरीकरणापासून वंचित राहिला आहे. एकीकडे एकेरी मार्गावर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे धावण्याचे कारण पुढे करीत नवीन गाड्यांना असमर्थता दाखवतात. दुसरीकडे रेल्वे बोर्डाला सदर मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही, प्रवासी नाही, नुकसान होण्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवितात, हे सगळे संतापजनक आहे.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

रेल्वेची भूमिका निराशाजनकया मार्गाचे दुहेरीकरण फायद्याचे असून देखील रेल्वे चालढकल करत आहे, हे संसदेतील उत्तरावरून लक्षात येते. दमरेने हे असे संभ्रम पसरविणारे उत्तर देण्यापेक्षा भूमिका स्पष्ट करायला हवी. जर टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करायचे असेल, तर तसे धोरण स्पष्ट करावे. आधीच मराठवाड्यात रेल्वे विकास रेंगाळलेला असताना रेल्वेची अशी भूमिका निराशाजनक आहे. पीटलाईनच्या बाबतीत तर दमरे सूड उगवल्यासारखी वागत आहे. सर्व मंजूर पीटलाईन आंध्र तेलंगणातील आहे.- स्वानंद सोळंके, वैज्ञानिक तथा रेल्वे अभ्यासक

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादparabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासी