शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

निराशाजनक ! परभणी- मनमाड दुहेरीकरणास रेल्वेकडून ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 17:29 IST

पूर्ण क्षमतेने वापर नसल्याचे कारण देत परभणी- मनमाड दुहेरीकरणास नकार दिला,  मात्र मनमाड ते औरंगाबाद दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड ( Parbhani - Manmad Railway Track ) या २९१ कि. मी. अंतर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे (Railways gives 'red signal' to Parbhani-Manmad doubling). या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचे उत्तर लोकसभेतील प्रश्नोत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.

मात्र त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. लोकसभेत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बुधवारी परभणी-मनमाड दुहेरीकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे. रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने दुहेरीकरणाला प्राधान्य देते. सध्या परभणी-मनमाड मार्गाचे पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने या मार्गाच्या दुहेरीकरणाची गरज नसल्याचे उत्तर देण्यात आले.

दुहेरीकरण का गरजेचे?दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल; शिवाय रेल्वेचा वेग वाढेल. एकेरी मार्गावर एखाद्या रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे कायमचा थांबेल.

‘दमरे’च्या अधिकाऱ्यांची नकारात्मकतामागील एका दशकापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक निर्णयामुळे परभणी-मनमाड मार्ग दुहेरीकरणापासून वंचित राहिला आहे. एकीकडे एकेरी मार्गावर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे धावण्याचे कारण पुढे करीत नवीन गाड्यांना असमर्थता दाखवतात. दुसरीकडे रेल्वे बोर्डाला सदर मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही, प्रवासी नाही, नुकसान होण्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवितात, हे सगळे संतापजनक आहे.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

रेल्वेची भूमिका निराशाजनकया मार्गाचे दुहेरीकरण फायद्याचे असून देखील रेल्वे चालढकल करत आहे, हे संसदेतील उत्तरावरून लक्षात येते. दमरेने हे असे संभ्रम पसरविणारे उत्तर देण्यापेक्षा भूमिका स्पष्ट करायला हवी. जर टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करायचे असेल, तर तसे धोरण स्पष्ट करावे. आधीच मराठवाड्यात रेल्वे विकास रेंगाळलेला असताना रेल्वेची अशी भूमिका निराशाजनक आहे. पीटलाईनच्या बाबतीत तर दमरे सूड उगवल्यासारखी वागत आहे. सर्व मंजूर पीटलाईन आंध्र तेलंगणातील आहे.- स्वानंद सोळंके, वैज्ञानिक तथा रेल्वे अभ्यासक

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादparabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासी