शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नाथषष्ठीच्या स्थगितीनंतरही दिंड्या पैठणकडे करतायत कूच; प्रशासनाकडून जनजागृती नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 12:05 IST

औरंगाबादसह राज्यभरातून अनेक पायी दिंड्या सुद्धा यावेळी पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात.

औरंगाबाद : कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून प्रशासनाकडून नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी करण्यात आले आहे. मात्र असे असताना सुद्धा अनेक दिंड्या पैठणच्या दिशेने कूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिंडीतील अनेक वारकऱ्यांना नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याबाबत माहितीच नसल्याचं सुद्धा समोर आले आहे.

दरवर्षी नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र पैठण येथे येतात. अंदाजे 4 लाखाच्या जवळपास भाविक नाथषष्ठी महोत्सव निमिताने पैठणमध्ये येत असतात. औरंगाबादसह राज्यभरातून अनेक पायी दिंड्या सुद्धा यावेळी पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात.

मात्र नाथषष्ठी महोत्सव यात्रेमध्ये व जमणाऱ्या जनसमुदाया मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन या रोगाचा फैलाव होऊ नये व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये नाथषष्ठी यात्रेस विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली आहे.

मात्र असे असताना सुद्धा, प्रशासनाकडून हवी तशी जनजागृती केली जात नसल्याने, अनेक दिंड्या पैठणच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात्रा रद्द झाली असल्याच्या माहितीला जास्तीत-जास्त प्रसिद्धी द्यावी असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात दिला गेला आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने, वारकरी सुद्धा संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे.

आम्ही गेली 30 ते 35 वर्षांपासून धोत्रा येथील दिंडी घेऊन पैठणला येत असतो. यावेळी सुद्धा आमची दिंडी पैठणला जाणार असून थोडे अंतर शिल्लक राहिले आहे. नाथषष्ठी रद्द झाली असल्याचं आयकल असून, खर काय खोट काय माहित नाही. आम्हाला आतापर्यंत रस्त्यात कुठेच कुणी अधिकारी किंवा व्यक्ती मिळाला नसून ज्यांच्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली असती. ( बाबू पाटील गोरे, वारकरी )