शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात १२ लाख ६५ हजार कोटींचे डिजिटल व्यवहार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 3, 2023 18:26 IST

ऑनलाइन पेमेंटवर भर, पाच रुपये देण्यासाठीही ‘यूपीआय’चा वापर

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी महिन्याचा पगार झाल्यावर बँक किंवा एटीएममधून रोख रक्कम काढून ती घरात देवासमोर आणून ठेवत आणि नंतर महिन्याचा खर्च करत असत. मात्र, आता डिजिटल व्यवहारामुळे खिशात नोटा ठेवण्याची गरज भासत नाही. परिणामी, पाच रुपये दुकानदाराला देण्यासाठी ‘यूपीआय’चा वापर केला जात आहे. यूपीआयचा वापर करण्यात औरंगाबाद जिल्हाही पाठीमागे नाही. मागील आर्थिक वर्षात तब्बल १२ लाख ६५ हजार कोटींचे डिजिटल व्यवहार येथील स्मार्ट नागरिकांनी केले.

कोरोनाकाळानंतर डिजिटल व्यवहार वाढलेनोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या होत्या. तेव्हापासून डिजिटल व्यवहाराकडे हळूहळू नागरिक वळत होते. मात्र, कोरोना काळानंतर नोटा हाताळणे कमी करून डिजिटल पेमेंट करणे अधिक वाढले. यात ‘व्यक्ती ते व्यक्ती’ व ‘व्यक्ती ते दुकानदार’ असे डिजिटल व्यवहार होत आहेत . परिणामी, मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात डिजिटल व्यवहाराने १२ लाख कोटींपर्यंत मजल मारली.

या माध्यमातून डिजिटल व्यवहारमाध्यम व्यवहाराची संख्या किती कोटींचे डिजिटल व्यवहार ?१) यूपीआय १४ कोटी ८२ लाख ... १ लाख ९८ हजार १२४ कोटी२) भीम आधार ९ कोटी ९२ लाख --- १५ हजार ६०० कोटी३) भारत क्यूआर कोड १ लाख १० हजार--- १३५ कोटी४) आयएमपीएस ३१ कोटी ४७ लाख---- ९ लाख ८६ हजार कोटी(इमिजेट इन्टरबँक इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर)५) डेबीट, क्रेडिट कार्ड १ कोटी ३२ लाख ----- ६५ हजार कोटी

डिजिटल व्यवहाराची संख्या ५७ कोटी ५६ लाखांवरडिजिटल व्यवहाराची संख्या जर लक्षात घेतली तर मागील वर्षभरात जिल्ह्यात नागरिकांनी स्मार्ट मोबाइलवरून तब्बल ५७ कोटी ५६ लाख ५८ हजार डिजिटल व्यवहार केले. त्यात सर्वाधिक व्यवहार मोबाइल बँकिंग (आयएमपीएस) च्या माध्यमातून ३१ कोटी ४७ लाख एवढे झाले असून, त्याद्वारे ९ लाख ८६ हजार कोटींचे डिजिटल पेमेंट करण्यात आले.

पासवर्ड व लॉगिन आयडी जपालोकांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करावे, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. परिणामी बँकेतच नव्हे तर एटीएमवरील गर्दी कमी झाली आहे. मात्र, डिजिटल व्यवहार करताना भीती नव्हे, सावधगिरी बाळगावी. आपला पासवर्ड व लॉगिन आयडी कोणालाही देऊ नये. फसवणूक झाली तर ३ दिवसांत संबंधित बँक किंवा रिझर्व्ह बँकेत तक्रार करावी. तुमच्याकडून चूक झाली नाही व फ्रॉड असेल तर ७ दिवसांच्या आत पेमेंट तुमच्या खात्यात जमा होऊ शकते.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

केंद्र सरकार देते भरपाईडिजिटल व्यवहारासाठी सेवा देणाऱ्या बँका व ॲप ग्राहकांकडून कमिशन घेत नाही. मात्र, त्या बदल्यात केंद्र सरकार त्यांना भरपाई देत असते. यासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdigitalडिजिटल