शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात १२ लाख ६५ हजार कोटींचे डिजिटल व्यवहार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 3, 2023 18:26 IST

ऑनलाइन पेमेंटवर भर, पाच रुपये देण्यासाठीही ‘यूपीआय’चा वापर

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी महिन्याचा पगार झाल्यावर बँक किंवा एटीएममधून रोख रक्कम काढून ती घरात देवासमोर आणून ठेवत आणि नंतर महिन्याचा खर्च करत असत. मात्र, आता डिजिटल व्यवहारामुळे खिशात नोटा ठेवण्याची गरज भासत नाही. परिणामी, पाच रुपये दुकानदाराला देण्यासाठी ‘यूपीआय’चा वापर केला जात आहे. यूपीआयचा वापर करण्यात औरंगाबाद जिल्हाही पाठीमागे नाही. मागील आर्थिक वर्षात तब्बल १२ लाख ६५ हजार कोटींचे डिजिटल व्यवहार येथील स्मार्ट नागरिकांनी केले.

कोरोनाकाळानंतर डिजिटल व्यवहार वाढलेनोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या होत्या. तेव्हापासून डिजिटल व्यवहाराकडे हळूहळू नागरिक वळत होते. मात्र, कोरोना काळानंतर नोटा हाताळणे कमी करून डिजिटल पेमेंट करणे अधिक वाढले. यात ‘व्यक्ती ते व्यक्ती’ व ‘व्यक्ती ते दुकानदार’ असे डिजिटल व्यवहार होत आहेत . परिणामी, मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात डिजिटल व्यवहाराने १२ लाख कोटींपर्यंत मजल मारली.

या माध्यमातून डिजिटल व्यवहारमाध्यम व्यवहाराची संख्या किती कोटींचे डिजिटल व्यवहार ?१) यूपीआय १४ कोटी ८२ लाख ... १ लाख ९८ हजार १२४ कोटी२) भीम आधार ९ कोटी ९२ लाख --- १५ हजार ६०० कोटी३) भारत क्यूआर कोड १ लाख १० हजार--- १३५ कोटी४) आयएमपीएस ३१ कोटी ४७ लाख---- ९ लाख ८६ हजार कोटी(इमिजेट इन्टरबँक इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर)५) डेबीट, क्रेडिट कार्ड १ कोटी ३२ लाख ----- ६५ हजार कोटी

डिजिटल व्यवहाराची संख्या ५७ कोटी ५६ लाखांवरडिजिटल व्यवहाराची संख्या जर लक्षात घेतली तर मागील वर्षभरात जिल्ह्यात नागरिकांनी स्मार्ट मोबाइलवरून तब्बल ५७ कोटी ५६ लाख ५८ हजार डिजिटल व्यवहार केले. त्यात सर्वाधिक व्यवहार मोबाइल बँकिंग (आयएमपीएस) च्या माध्यमातून ३१ कोटी ४७ लाख एवढे झाले असून, त्याद्वारे ९ लाख ८६ हजार कोटींचे डिजिटल पेमेंट करण्यात आले.

पासवर्ड व लॉगिन आयडी जपालोकांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करावे, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. परिणामी बँकेतच नव्हे तर एटीएमवरील गर्दी कमी झाली आहे. मात्र, डिजिटल व्यवहार करताना भीती नव्हे, सावधगिरी बाळगावी. आपला पासवर्ड व लॉगिन आयडी कोणालाही देऊ नये. फसवणूक झाली तर ३ दिवसांत संबंधित बँक किंवा रिझर्व्ह बँकेत तक्रार करावी. तुमच्याकडून चूक झाली नाही व फ्रॉड असेल तर ७ दिवसांच्या आत पेमेंट तुमच्या खात्यात जमा होऊ शकते.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

केंद्र सरकार देते भरपाईडिजिटल व्यवहारासाठी सेवा देणाऱ्या बँका व ॲप ग्राहकांकडून कमिशन घेत नाही. मात्र, त्या बदल्यात केंद्र सरकार त्यांना भरपाई देत असते. यासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdigitalडिजिटल