शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात १२ लाख ६५ हजार कोटींचे डिजिटल व्यवहार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 3, 2023 18:26 IST

ऑनलाइन पेमेंटवर भर, पाच रुपये देण्यासाठीही ‘यूपीआय’चा वापर

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी महिन्याचा पगार झाल्यावर बँक किंवा एटीएममधून रोख रक्कम काढून ती घरात देवासमोर आणून ठेवत आणि नंतर महिन्याचा खर्च करत असत. मात्र, आता डिजिटल व्यवहारामुळे खिशात नोटा ठेवण्याची गरज भासत नाही. परिणामी, पाच रुपये दुकानदाराला देण्यासाठी ‘यूपीआय’चा वापर केला जात आहे. यूपीआयचा वापर करण्यात औरंगाबाद जिल्हाही पाठीमागे नाही. मागील आर्थिक वर्षात तब्बल १२ लाख ६५ हजार कोटींचे डिजिटल व्यवहार येथील स्मार्ट नागरिकांनी केले.

कोरोनाकाळानंतर डिजिटल व्यवहार वाढलेनोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या होत्या. तेव्हापासून डिजिटल व्यवहाराकडे हळूहळू नागरिक वळत होते. मात्र, कोरोना काळानंतर नोटा हाताळणे कमी करून डिजिटल पेमेंट करणे अधिक वाढले. यात ‘व्यक्ती ते व्यक्ती’ व ‘व्यक्ती ते दुकानदार’ असे डिजिटल व्यवहार होत आहेत . परिणामी, मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात डिजिटल व्यवहाराने १२ लाख कोटींपर्यंत मजल मारली.

या माध्यमातून डिजिटल व्यवहारमाध्यम व्यवहाराची संख्या किती कोटींचे डिजिटल व्यवहार ?१) यूपीआय १४ कोटी ८२ लाख ... १ लाख ९८ हजार १२४ कोटी२) भीम आधार ९ कोटी ९२ लाख --- १५ हजार ६०० कोटी३) भारत क्यूआर कोड १ लाख १० हजार--- १३५ कोटी४) आयएमपीएस ३१ कोटी ४७ लाख---- ९ लाख ८६ हजार कोटी(इमिजेट इन्टरबँक इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर)५) डेबीट, क्रेडिट कार्ड १ कोटी ३२ लाख ----- ६५ हजार कोटी

डिजिटल व्यवहाराची संख्या ५७ कोटी ५६ लाखांवरडिजिटल व्यवहाराची संख्या जर लक्षात घेतली तर मागील वर्षभरात जिल्ह्यात नागरिकांनी स्मार्ट मोबाइलवरून तब्बल ५७ कोटी ५६ लाख ५८ हजार डिजिटल व्यवहार केले. त्यात सर्वाधिक व्यवहार मोबाइल बँकिंग (आयएमपीएस) च्या माध्यमातून ३१ कोटी ४७ लाख एवढे झाले असून, त्याद्वारे ९ लाख ८६ हजार कोटींचे डिजिटल पेमेंट करण्यात आले.

पासवर्ड व लॉगिन आयडी जपालोकांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करावे, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. परिणामी बँकेतच नव्हे तर एटीएमवरील गर्दी कमी झाली आहे. मात्र, डिजिटल व्यवहार करताना भीती नव्हे, सावधगिरी बाळगावी. आपला पासवर्ड व लॉगिन आयडी कोणालाही देऊ नये. फसवणूक झाली तर ३ दिवसांत संबंधित बँक किंवा रिझर्व्ह बँकेत तक्रार करावी. तुमच्याकडून चूक झाली नाही व फ्रॉड असेल तर ७ दिवसांच्या आत पेमेंट तुमच्या खात्यात जमा होऊ शकते.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

केंद्र सरकार देते भरपाईडिजिटल व्यवहारासाठी सेवा देणाऱ्या बँका व ॲप ग्राहकांकडून कमिशन घेत नाही. मात्र, त्या बदल्यात केंद्र सरकार त्यांना भरपाई देत असते. यासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdigitalडिजिटल