शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विकास कामांना कासवगती; औरंगाबादमध्ये ९ महिन्यांत झाले फक्त ८ किलोमीटर रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:46 IST

शहरात रस्त्यांची कामे कासवगतीने

ठळक मुद्देमनपा आयुक्तांनी दिली १५ जानेवारीची मुदत मुदतीनंतर सर्व कामे ताब्यात घेण्याचा दिला इशारा 

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १०० कोटींतील निधीतून मनपाने मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त आठ किलोमीटर कामे पूर्ण केली.  कासवगतीने सुरू असलेल्या कामांबद्दल आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी आश्चर्य व्यक्त केले. १५ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व कामकाज मी ताब्यात घेईन, असा इशाराही त्यांनी दिला.

जानेवारीत कंत्राटदारांना वर्कआॅर्डर देण्यात आली. दोन महिने उशिराने कामे सुरू झाली. ड्रेनेज, पाईपलाईन शिफ्ट करणे, पोल, रोहित्र हटविणे, अशा कामांमुळे विलंब झाल्याचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी तुम्हाला १५ जानेवारीपर्यंत वेळ देतो, नंतर मी सर्व ताब्यात घेईन, अशी तंबी आयुक्तांनी दिली. समांतर जलवाहिनी योजना, एलईटी प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. एलईडी प्रकल्पासाठी किती पैसा जातो? अशी विचारणादेखील त्यांनी केली.

शहराच्या पाणीपुरवठ्याचा आढावादेखील आयुक्तांनी घेतला. शासनाने मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयांची योजना कोणत्या स्तरावर आहे. शहरात किती बेकायदा नळ आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांना आयुक्तांनी विचारली. त्यावर अधिकाऱ्यांना बेकायदा नळांची माहिती सांगता आली नाही. प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र करण्याची सूचना आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना केली. सरकारी कार्यालयात महापालिकेचा एक कर्मचारी नियुक्त करण्याचे आयुक्तांनी नमूद केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीState Governmentराज्य सरकारroad safetyरस्ते सुरक्षा