शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

विकास रखडला; महापौरांची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:19 IST

: महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. विकासकामे करायची तरी कशी, असा प्रश्न प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पडला आहे. तिजोरीवर १७० कोटींचे दायित्व येऊन ठेपले आहे.

ठळक मुद्देमहापालिका दिवाळखोरीत : पुढील दीड वर्षाचा कार्यकाळ खडतर

औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. विकासकामे करायची तरी कशी, असा प्रश्न प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पडला आहे. तिजोरीवर १७० कोटींचे दायित्व येऊन ठेपले आहे. आणखी १०० कोटींनी भार वाढणार आहे. चोकअप झालेली ड्रेनेजलाईन दुरुस्त करायलाही कंत्राटदार तयार नाहीत. काम केल्यावर पैसे किती वर्षांनंतर मिळतील, याची गॅरंटी नाही. तिजोरी रिकामी झाल्याने महापालिका दिवाळखोरीत निघाल्याची घोषणा करणेच बाकी आहे. अशा वाईट अवस्थेत महापौर नंदकुमार घोडेले यांच्या कार्यकाळाला उद्या सोमवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. पुढील दीड वर्षाचा कार्यकाळ यापेक्षाही अधिक खडतर जाणार, हे निश्चित.२९ आॅक्टोबर २०१७ रोजी नंदकुमार घोडेले यांनी शहराचे २२ वे महापौर म्हणून धुरा सांभाळली. मागील वर्षभरात त्यांनी घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्यातील छोटी-छोटी दोन-चार कामे सोडली, तर उर्वरित ९० टक्के कामांची प्रशासनाकडून अंमलबजावणीच झालेली नाही. एकीकडे तिजोरी रिकामी म्हणून विकासकामे रखडली आहेत. दुसरीकडे ज्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी पडून आहे, ती कामेही प्रशासन ताकदीने करायला तयार नाही. कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ९० कोटी, ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपये शासनाकडून आलेले आहेत. समांतर जलवाहिनीचा प्रश्नही रेंगाळला आहे. शहराच्या विकासाला गती देणारा विकास आराखडा तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे शहरात ४० मोठे प्रकल्प अडकले आहेत. या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचे दायित्वही अर्थात सत्ताधाºयांवरच आहे. सर्वसामान्यांना महापालिकेकडून खूप अपेक्षा नाहीत. मुबलक पाणी, गुळगुळीत रस्ते, रात्री लख्ख प्रकाश पाडणारे दिवे आणि चांगली ड्रेनेज यंत्रणा एवढेच अपेक्षित आहे. महापालिका या चारही आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. महापालिका भूलभूत सोयीसुविधाच देणार नसेल, तर शहर स्मार्ट कसे करणार? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.आर्थिक स्रोत कोणी बंद केलेमालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना, मालमत्ता विभाग हे महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत आहेत. वॉर्डात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपा कर्मचारी गेल्यावर नगरसेवक खेकसतात, पाणीपट्टीचे बिल मागायला गेल्यावरही तीच अवस्था असते. अनेक नागरिक चोरी करून पाणी वापरतात, त्याला राजकीय आश्रय कोणाचा असतो. नगररचना विभागात लहान-मोठ्या फायली मंजूर करण्यासाठी राजकीय मंडळीच ‘एनओसी’ देतात. महापालिकेच्या मालकीच्या जागा, दुकाने कोणी भाडेतत्त्वावर घेतली आहेत. त्यांचे भाडे दरवर्षी मनपाच्या तिजोरीत का येत नाही. याचा सरासार विचार कोणी करीत नाही. ही सर्व परिस्थिती राजकीय मंडळीच सहजपणे बदलू श्कतात.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौर