शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

देशातील छावणी परिषदांचा विकास लवकरच; संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:46 IST

देशातील छावणी परिषदांच्या विविध विकास योजनांवर केंद्र शासन गांभीर्याने विचार करीत असून, लवकरच त्या योजना राबविण्याचे निर्देश दिले जातील, अशी आशा विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देछावणी परिषदांच्या विकासासंदर्भात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत बैठक देशातील ६२ छावणी परिषदांचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक (सदस्य) आणि संबंधित खासदार यांची उपस्थिती त छावणी परिषदांचा विकास आणि विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

औरंगाबाद : देशातील छावणी परिषदांच्या विविध विकास योजनांवर केंद्र शासन गांभीर्याने विचार करीत असून, लवकरच त्या योजना राबविण्याचे निर्देश दिले जातील, अशी आशा विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. 

छावणी परिषदांच्या विकासासंदर्भात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील ६२ छावणी परिषदांचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक (सदस्य) आणि संबंधित खासदार यांची नुकतीच दिल्ली येथे एक बैठक घेतली. त्यात छावणी परिषदांचा विकास आणि विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. 

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, मुरली मनोहर जोशी, औरंगाबादचे खा. चंद्रकांत खैरे, औरंगाबाद छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे आणि ज्येष्ठ नगरसेवक किशोर कच्छवाह यांची यावेळी उपस्थिती होती. त्यांनी औरंगाबाद छावणी परिषदेच्या विकासासंदर्भात संरक्षणमंत्री आणि राज्यमंत्र्यांना निवेदने दिले होते. त्याबाबत योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते. 

छावणी परिषदा या सैन्यदलाचा आणि संबंधित शहरांचा अविभाज्य भाग आहेत. शहरासोबतच संबंधित छावणी परिषदांचाही विकास झाला पाहिजे, अशी एकमुखी मागणी उपस्थित उपाध्यक्षांनी केली होती. त्याचा योग्य तो विचार होईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. विशेषत: छावणीतील नागरी भागात (सिव्हिल एरिया) सध्या ‘एक - एफएसआय’ आहे तो ‘दोन’ करावा आणि नागरी भागाबाहेरील ‘अर्धा’ एफएसआय वाढवून ‘एक’ करावा, अशी मागणी करण्यात आली होती. 

अनेक मागण्या : सकारात्मक प्रतिसादछावणीतील जमिनी ‘फ्रीहोल्ड’ करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून, त्यासाठी २ ते ३ वर्षे लागतात. त्याऐवजी स्थानिक छावणी परिषदांना ‘फ्रीहोल्ड’चे अधिकार द्यावेत. नागरी परिसरातील जमिनींचे ए-१, ए-२, बी-१, बी-२, बी-३, बी-४ आणि सी, असे वर्गीकरण आहे. त्यांचे पुनर्वर्गीकरण करण्याचे अधिकार छावणी परिषदांना द्यावेत. राज्य आणि केंद्र शासन ‘जीएसटी’च्या माध्यमातून छावणी परिसरातून गोळा करीत असलेल्या महसुलातून परिषदांना हिस्सा मिळावा. छावणी परिसरातील भरमसाठ वाढ केलेला मालमत्ता कर कमी करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार