शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मनसेची रणनीती ठरली, विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार

By बापू सोळुंके | Updated: October 6, 2023 14:33 IST

आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर: आधीचे सरकार असो किंवा आताचे सरकार  विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, सत्तेतून पैसा कमवितात, यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे  नाही, असा आरोप करीत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.  विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आगामी लोकसभेत २० ते २५ जागा लढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघानिहाय मेळावे घेण्यासाठी दोन दिवसांपासून नांदगावकर छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. शुक्रवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक अद्याप जाहिर झालेली नाही, पण पक्षाने ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आम्ही काल शहरातील पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतल्यानंतर आज पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

पक्षाकडे उमेदवार कोठे या प्रश्नाचे उत्तर देताना नांदगावकर म्हणाले की, आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो. मनसेने विकासाच्या प्रश्नांवर शहरात अनेक आंदोलन केली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जाहिर सभा घेतली. पक्षाने आंदोलन केले. एवढेच नव्हे तर गणेशोत्सवातही डि.जे. लावून नाचणाऱ्यांचाही त्यांनी विरोध केला आहे. आगामी जिल्ह्यात पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे असताना तुम्ही लोकसभा निवडणुक लढविण्याचे धाडस कोणाच्या जिवावर करता, असा प्रश्न उपस्थित केला असता मनसे नेते म्हणाले की, लोकसभा मतदार संघातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये समस्यांच समस्या आहेत. याकडे आताचे सत्ताधारी आणि आधीचे सत्ताधारी यांनी लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर मनपा आयुक्तही विकास कामाच्या बाबतीत उदासिन दिसतात. यामुळे आजी,माजी सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला  मराठवाडा संपर्कप्रमुख दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी आदींची उपस्थिती होती.

बाळासाहेबांच्या विचारधारेचे आम्हीआमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर चालणारा आहे. जे चूक आहे, ते आम्ही ठणकावून सांगणार मग समोर नरेंद्र मोदी असो किंवा अन्य काेणीही.सरकारनेही मराठासमाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा