शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मनसेची रणनीती ठरली, विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार

By बापू सोळुंके | Updated: October 6, 2023 14:33 IST

आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर: आधीचे सरकार असो किंवा आताचे सरकार  विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, सत्तेतून पैसा कमवितात, यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे  नाही, असा आरोप करीत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.  विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आगामी लोकसभेत २० ते २५ जागा लढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघानिहाय मेळावे घेण्यासाठी दोन दिवसांपासून नांदगावकर छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. शुक्रवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक अद्याप जाहिर झालेली नाही, पण पक्षाने ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आम्ही काल शहरातील पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतल्यानंतर आज पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

पक्षाकडे उमेदवार कोठे या प्रश्नाचे उत्तर देताना नांदगावकर म्हणाले की, आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो. मनसेने विकासाच्या प्रश्नांवर शहरात अनेक आंदोलन केली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जाहिर सभा घेतली. पक्षाने आंदोलन केले. एवढेच नव्हे तर गणेशोत्सवातही डि.जे. लावून नाचणाऱ्यांचाही त्यांनी विरोध केला आहे. आगामी जिल्ह्यात पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे असताना तुम्ही लोकसभा निवडणुक लढविण्याचे धाडस कोणाच्या जिवावर करता, असा प्रश्न उपस्थित केला असता मनसे नेते म्हणाले की, लोकसभा मतदार संघातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये समस्यांच समस्या आहेत. याकडे आताचे सत्ताधारी आणि आधीचे सत्ताधारी यांनी लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर मनपा आयुक्तही विकास कामाच्या बाबतीत उदासिन दिसतात. यामुळे आजी,माजी सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला  मराठवाडा संपर्कप्रमुख दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी आदींची उपस्थिती होती.

बाळासाहेबांच्या विचारधारेचे आम्हीआमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर चालणारा आहे. जे चूक आहे, ते आम्ही ठणकावून सांगणार मग समोर नरेंद्र मोदी असो किंवा अन्य काेणीही.सरकारनेही मराठासमाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा