शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची रणनीती ठरली, विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार

By बापू सोळुंके | Updated: October 6, 2023 14:33 IST

आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर: आधीचे सरकार असो किंवा आताचे सरकार  विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, सत्तेतून पैसा कमवितात, यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे  नाही, असा आरोप करीत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.  विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आगामी लोकसभेत २० ते २५ जागा लढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघानिहाय मेळावे घेण्यासाठी दोन दिवसांपासून नांदगावकर छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. शुक्रवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक अद्याप जाहिर झालेली नाही, पण पक्षाने ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आम्ही काल शहरातील पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतल्यानंतर आज पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

पक्षाकडे उमेदवार कोठे या प्रश्नाचे उत्तर देताना नांदगावकर म्हणाले की, आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहेत. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो. मनसेने विकासाच्या प्रश्नांवर शहरात अनेक आंदोलन केली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जाहिर सभा घेतली. पक्षाने आंदोलन केले. एवढेच नव्हे तर गणेशोत्सवातही डि.जे. लावून नाचणाऱ्यांचाही त्यांनी विरोध केला आहे. आगामी जिल्ह्यात पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे असताना तुम्ही लोकसभा निवडणुक लढविण्याचे धाडस कोणाच्या जिवावर करता, असा प्रश्न उपस्थित केला असता मनसे नेते म्हणाले की, लोकसभा मतदार संघातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये समस्यांच समस्या आहेत. याकडे आताचे सत्ताधारी आणि आधीचे सत्ताधारी यांनी लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर मनपा आयुक्तही विकास कामाच्या बाबतीत उदासिन दिसतात. यामुळे आजी,माजी सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला  मराठवाडा संपर्कप्रमुख दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी आदींची उपस्थिती होती.

बाळासाहेबांच्या विचारधारेचे आम्हीआमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर चालणारा आहे. जे चूक आहे, ते आम्ही ठणकावून सांगणार मग समोर नरेंद्र मोदी असो किंवा अन्य काेणीही.सरकारनेही मराठासमाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा