शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

टोल वसुली बुथवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धोरण निश्चित करा; खंडपीठाचे राज्यशासनास आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:02 IST

धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्य सचिवांकडून मागविले स्पष्टीकरण

ठळक मुद्देकंत्राटदाराला लेन बंद करण्याचा अधिकार नाहीमहामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्याची जबाबदारी कोणाची?

औरंगाबाद : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे वरील टोल वसुली बुथवर (टोल प्लाझा) वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शासनाने धोरण निश्चित करावे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठीची यंत्रणा कशाप्रकारे काम करील याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांनी तीन आठवड्यांत शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. झेड.ए. हक आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी गुरुवारी (दि. २७) राज्य शासनाला दिला. 

टोल प्लाझावरील उपलब्ध असलेले काही मार्ग बंद ठेवण्याचा कंत्राटदाराला अधिकार आहे काय, ते सर्व मार्ग चालू का ठेवत नाहीत, याबाबत खंडपीठाने  मंगळवारी (दि २५) शासनाकडून खुलासा मागविला होता. गुरुवारी शासनाने शपथपत्र दाखल करून कंत्राटदाराला तसा अधिकार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. काही मार्ग बंद ठेवण्याची कंत्राटदाराची कृती बेकायदेशीर आणि महामार्गाला अडथळा आणि प्रतिबंध करणारी आहे. कंत्राटदाराने अशा प्रकारे मार्ग बंद केल्याचे आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सा.बां. विभागाची जबाबदारी आहे. या खात्यामार्फत टोलनाक्यावर लक्ष ठेवण्याची आणि कसूरदारावर कारवाई करण्याची हमी शपथपत्राद्वारे सा.बां. विभागांतर्गतच्या जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरसिंग विश्वंभर भांडे यांनी खंडपीठास दिली.  याचिकाकर्ते सतीश तळेकर यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर आणि अजिंक्य काळे, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील अतुल काळे यांनी काम पाहिले.

कंत्राटदाराला लेन बंद करण्याचा अधिकार नाहीटोल बुथवरील उपलब्ध असलेला एकही मार्ग (लेन) बंद ठेवण्याच्या कंत्राटदाराला अधिकार नसल्याचे शासनाने पोलिसांसह सर्व खात्यांना कळवावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.  कायदा, नियम, परिपत्रक किंवा वैयक्तिक कराराद्वारे कोणताही टोल प्लाझा कंत्राटदार अथवा व्यवस्थापकाला  टोल बुथवरील  उपलब्ध असलेला एकही मार्ग (लेन) बंद ठेवण्याची परवानगी दिली नसल्याचे शासनाने शपथपत्रात स्पष्टीकरण दिले आहे. 

महामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्याची जबाबदारी कोणाची?बंद झालेल्या टोल प्लाझावरील बांधकामे आणि अपघात अथवा अन्य कारणाने महामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची की राज्य शासनाची या दोन मुद्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी मुदत देण्याची विनंती शासनाने शपथपत्रात केली. त्यामुळे या जनहित याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठhighwayमहामार्गState Governmentराज्य सरकार