शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

By विजय सरवदे | Updated: November 2, 2022 20:18 IST

जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- विजय सरवदे

औरंगाबाद : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे लम्पी साथरोग आटोक्यात आली असली तरी बाधित पशुधनाचे मृत्यूसत्र थांबायचे नाव घेत नाही. सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू असून,यापैकी ९९ जनावरांची परिस्थिती गंभीर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘लम्पी’ग्रस्त ३३२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने रोज ४-५ जनावरांचा मृत्यू होत आहे,ही चिंतेची बाब आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की,जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडल्यामुळे त्या त्या पशुचिकित्सालयांमार्फत ‘डिप्लोमा’धारकांकडूनही लसीकरण केले जात आहे. त्यांना प्रती लस ५ रुपये याप्रमाणे मोबदला दिला जातोय. दरम्यान, जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर पशुपालक चिंतामुक्त होत आहेत. जनावरांना होणाऱ्या त्रासाकडे बारीक लक्ष ठेवल्यास वेळीच उपचार मिळून ते रोगमुक्त होऊ शकतात. पण,असे होताना दिसत नाही. त्यामुळेच मृत्यूसत्र थांबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ६७३ बाधित जनावरांपैकी उपचार मिळाल्यामुळे तब्बल ३ हजार २९७ जनावरे रोगमुक्त झाली असून सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. जि.प. पशुसंवर्धन विभागाने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे रोगमुक्त होणाऱ्या जनावरांचे प्रमाण समाधनकारक आहे.

तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटातशासनाने लम्पी साथरोगामुळे दगावणाऱ्या पशुधनासाठी नुकसानभरपाईपोटी मोबदला देऊन पशुपालकांना दिलासा दिला जात आहे. मात्र,६०-७० हजारांचा बैैल अथवा गाय दगावल्यास २५-३० हजार एवढा तुटपुंजा मोबदला दिला जातोे. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले आहेत. मोबदल्याच्या प्रस्तावासाठी पंचनामा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. मात्र,तहसीलदार,तलाठी,ग्रामसेवक या सरकारी अधिकाऱ्यांसमक्षच पंचनामा होणे अपेक्षित असून हे अधिकारी अनेकदा त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात. परिणामी,पंचनाम्यासाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे १४७ मोबदल्याचे प्रस्ताव रखडले आहेत. आजवर अनुदानाचे १८५ प्रस्ताव निकाली निघाले असून जवळपास ३५ लाखांपर्यंत नुकसानीचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी