शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

By विजय सरवदे | Updated: November 2, 2022 20:18 IST

जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- विजय सरवदे

औरंगाबाद : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे लम्पी साथरोग आटोक्यात आली असली तरी बाधित पशुधनाचे मृत्यूसत्र थांबायचे नाव घेत नाही. सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू असून,यापैकी ९९ जनावरांची परिस्थिती गंभीर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘लम्पी’ग्रस्त ३३२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने रोज ४-५ जनावरांचा मृत्यू होत आहे,ही चिंतेची बाब आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की,जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडल्यामुळे त्या त्या पशुचिकित्सालयांमार्फत ‘डिप्लोमा’धारकांकडूनही लसीकरण केले जात आहे. त्यांना प्रती लस ५ रुपये याप्रमाणे मोबदला दिला जातोय. दरम्यान, जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर पशुपालक चिंतामुक्त होत आहेत. जनावरांना होणाऱ्या त्रासाकडे बारीक लक्ष ठेवल्यास वेळीच उपचार मिळून ते रोगमुक्त होऊ शकतात. पण,असे होताना दिसत नाही. त्यामुळेच मृत्यूसत्र थांबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ६७३ बाधित जनावरांपैकी उपचार मिळाल्यामुळे तब्बल ३ हजार २९७ जनावरे रोगमुक्त झाली असून सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. जि.प. पशुसंवर्धन विभागाने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे रोगमुक्त होणाऱ्या जनावरांचे प्रमाण समाधनकारक आहे.

तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटातशासनाने लम्पी साथरोगामुळे दगावणाऱ्या पशुधनासाठी नुकसानभरपाईपोटी मोबदला देऊन पशुपालकांना दिलासा दिला जात आहे. मात्र,६०-७० हजारांचा बैैल अथवा गाय दगावल्यास २५-३० हजार एवढा तुटपुंजा मोबदला दिला जातोे. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले आहेत. मोबदल्याच्या प्रस्तावासाठी पंचनामा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. मात्र,तहसीलदार,तलाठी,ग्रामसेवक या सरकारी अधिकाऱ्यांसमक्षच पंचनामा होणे अपेक्षित असून हे अधिकारी अनेकदा त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात. परिणामी,पंचनाम्यासाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे १४७ मोबदल्याचे प्रस्ताव रखडले आहेत. आजवर अनुदानाचे १८५ प्रस्ताव निकाली निघाले असून जवळपास ३५ लाखांपर्यंत नुकसानीचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी