शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

By विजय सरवदे | Updated: November 2, 2022 20:18 IST

जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- विजय सरवदे

औरंगाबाद : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे लम्पी साथरोग आटोक्यात आली असली तरी बाधित पशुधनाचे मृत्यूसत्र थांबायचे नाव घेत नाही. सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू असून,यापैकी ९९ जनावरांची परिस्थिती गंभीर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘लम्पी’ग्रस्त ३३२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने रोज ४-५ जनावरांचा मृत्यू होत आहे,ही चिंतेची बाब आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की,जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडल्यामुळे त्या त्या पशुचिकित्सालयांमार्फत ‘डिप्लोमा’धारकांकडूनही लसीकरण केले जात आहे. त्यांना प्रती लस ५ रुपये याप्रमाणे मोबदला दिला जातोय. दरम्यान, जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर पशुपालक चिंतामुक्त होत आहेत. जनावरांना होणाऱ्या त्रासाकडे बारीक लक्ष ठेवल्यास वेळीच उपचार मिळून ते रोगमुक्त होऊ शकतात. पण,असे होताना दिसत नाही. त्यामुळेच मृत्यूसत्र थांबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ६७३ बाधित जनावरांपैकी उपचार मिळाल्यामुळे तब्बल ३ हजार २९७ जनावरे रोगमुक्त झाली असून सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. जि.प. पशुसंवर्धन विभागाने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे रोगमुक्त होणाऱ्या जनावरांचे प्रमाण समाधनकारक आहे.

तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटातशासनाने लम्पी साथरोगामुळे दगावणाऱ्या पशुधनासाठी नुकसानभरपाईपोटी मोबदला देऊन पशुपालकांना दिलासा दिला जात आहे. मात्र,६०-७० हजारांचा बैैल अथवा गाय दगावल्यास २५-३० हजार एवढा तुटपुंजा मोबदला दिला जातोे. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले आहेत. मोबदल्याच्या प्रस्तावासाठी पंचनामा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. मात्र,तहसीलदार,तलाठी,ग्रामसेवक या सरकारी अधिकाऱ्यांसमक्षच पंचनामा होणे अपेक्षित असून हे अधिकारी अनेकदा त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात. परिणामी,पंचनाम्यासाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे १४७ मोबदल्याचे प्रस्ताव रखडले आहेत. आजवर अनुदानाचे १८५ प्रस्ताव निकाली निघाले असून जवळपास ३५ लाखांपर्यंत नुकसानीचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी