शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग!

By साहेबराव हिवराळे | Updated: April 22, 2023 19:48 IST

कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी शोधताहेत ‘खाते’ सोशल मीडियाचा घेतला आधार!

छत्रपती संभाजीनगर : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार तसेच त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. पाठ्यपुस्तके तसेच देश व परदेशातील शैक्षणिक शिष्यवृत्तीही त्याचाच भाग आहे. त्यासाठी पात्र पाल्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी जवळपास साडेपाच हजार अर्ज भरून घेण्यात आले. खबरदारी घेतली, तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग झाले आहेत. आता कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी ‘खाते’ सोशल मीडियाच्या मदतीने शोध घेत आहेत.

साडेपाच हजारपैकी २०० नॉट रिचेबल...कामगार कल्याण मंडळात अर्ज दाखल करताना विद्यार्थी तसेच पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज हे खासगी सेवा केंद्रामार्फत मंडळाला दाखल केले आहेत. त्यांनी त्या अर्जांची पडताळणी करून ते पुढे पाठविल्याचे सांगितले असले तरी विद्यार्थ्याच्या खात्यात अद्याप काहीही जमा झालेले नाही. ज्यांच्याकडे मोबाइलच नाही, त्यांचे स्वत:चे किंवा वडिलांचे जनधन खाते असेल काय, याचा शोध अधिकारी घेत आहेत.

कामगार पाल्यांच्या शिष्यवृत्ती अर्जात त्रुटी...शैक्षणिक सत्र संपत आले असून, छत्रपती संभाजीनगर विभागात अनेक त्रुटी आढळून आल्या. अजून किती दिवस प्रतीक्षा करावी, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. यंदा पडताळणी करून अर्ज स्वीकारले आहेत, मग कामगार पाल्यांपैकी दोनशे पाल्य अद्याप शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत कसे राहिले, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

उच्च शिक्षितांच्या खात्यातही शिष्यवृत्ती...मंडळाने यंदा अत्यंत गतिमान काम केलेले आहे. पाठ्यपुस्तक व इतर साहित्य देण्यात आले असून, शिष्यवृत्तीचा निधीही बँक खात्यात टाकण्यात आला. परंतु, ज्या दोनशे कामगार पाल्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यांनी त्यांच्या खाते नंबरसह नजीकच्या कामगार मंडळ किंवा ललित कला भवनात वरिष्ठांशी संपर्क साधावा. पात्र ठरलेल्या पाल्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती पाठविणार आहोत.-मनोज पाटील, सहायक कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण