शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

साखरेचा चांगला भाव असूनही कारखाने देत आहेत ऊसाला कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:28 IST

साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

 बीड/माजलगाव : सन 2016-17 चा गाळप हंगाम सुरु होतांना इतर कारखान्यांच्या तुलनते जास्त भाव देण्याच्या वल्गना करणा-या तालुक्यातील दोन्ही सहकरी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर दिल्याचा कांगावा करीत इतर कारखान्यांपेक्षा प्रतिटन 600 रुपये कमी भाव देऊन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असुन साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. 

 
माजलगांव तालुक्यात सलग तिन वर्षे दुष्काळाची परिस्थिती असतांनाही गेल्या वर्षीच्या हंगामात तालुक्यातील तिन कारखान्यांनी जवळपास 3 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी प्रत्येक कारखान्याकडुन इतर कारखान्यांच्या तुलनेत आम्ही जास्त भाव देवू अशी वल्गना करुन शेतक-यांना आकर्षीत करण्याचे काम केले. मोठया अपेक्षेने शेतक-यांनी या कारखान्यांना आपला उस दिला. वास्तविक उसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे उस ओढण्यासाठी कारखान्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पहावयास मिळाली मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष दर देण्याची वेळ आली त्यावेळी या कारखान्यांनी वेगवेगळी कारणे सांगत कमी दरात शेतक-यांची बोळवण केली.
 दोन वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या वर्षीच्या गाळपातच छत्रपतीला साजेसा भाव दिला जाईल अशी वल्गना करणा-या सावरगांव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 2 हजार रुपयांप्रमाणे शेतक-यांना पैसे दिले तर तेलगांव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सह. साखर कारखान्याने देखील 2 हजार प्रमाणेच भाव दिला मात्र खाजगी तत्वावर चालणा-या पवारवाडी येथील जय महेश शुगरने शेतक-यांना 2 हजार 600 रुपयांप्रमाणे भाव पहिल्याच हप्त्यात दिला. त्या तुलनेत सहकारी तत्वावरील दोन्ही कारखान्यांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसत चांगलाच मलिदा मिळविला. 
 
शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान 
गेल्या हंगामात सुंदरराव सोळंके कारखान्याने 89 हजार मे.टन., छत्रपती 71 हजार 82 मे.टन तर जय महेशने 1 लाख 31 हजार 500 मे.टन उसाचे गाळप केले सहकारी कारखान्यांनी शेतक-यांना दिलेल्या भावामुळे शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
 
मागील पाच सहा महिन्यांपासुन साखरेचा भाव हा गगनाला भिडलेला असुन तो 3 हजार 500 ते 4 हजार इतका आहे. साखरेला एवढा भाव असतांना देखील त्याच्या अर्धाच भाव शेतक-यांना मिळतो आहे यात कारखाने मोठया प्रमाणावर फायद्यात आहेत मात्र मागील काळातील तुट भरुन काढण्याच्या नावाखाली कारखाने शेतक-यांची लुट करीत आहेत. 
 
भाव वाढवण्याच्या विचारात 
कारखान्याने या वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जास्त भाव दिलेला आहे असे असतांनाही आणखीन भाव वाढवुन देण्याचे कारखाना प्रशासनाच्या विचाराधीन आहे. 
- एम.डी. घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक, सुंदरराव सोळंके सह.साखर कारखाना 
 
जास्त भाव दिला आहे 
आमचा नविन कारखाना असुन आम्हाला बायप्रोडक्टच्या माध्यमातुन कसलेही इतर उत्पन्न मिळत नाही तरी देखील कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा 219 रुपयांनी भाव जास्त दिलेला आहे. 
- आर.एस. शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती सहकारी साखर कारखाना