शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा चांगला भाव असूनही कारखाने देत आहेत ऊसाला कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:28 IST

साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

 बीड/माजलगाव : सन 2016-17 चा गाळप हंगाम सुरु होतांना इतर कारखान्यांच्या तुलनते जास्त भाव देण्याच्या वल्गना करणा-या तालुक्यातील दोन्ही सहकरी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर दिल्याचा कांगावा करीत इतर कारखान्यांपेक्षा प्रतिटन 600 रुपये कमी भाव देऊन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असुन साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. 

 
माजलगांव तालुक्यात सलग तिन वर्षे दुष्काळाची परिस्थिती असतांनाही गेल्या वर्षीच्या हंगामात तालुक्यातील तिन कारखान्यांनी जवळपास 3 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी प्रत्येक कारखान्याकडुन इतर कारखान्यांच्या तुलनेत आम्ही जास्त भाव देवू अशी वल्गना करुन शेतक-यांना आकर्षीत करण्याचे काम केले. मोठया अपेक्षेने शेतक-यांनी या कारखान्यांना आपला उस दिला. वास्तविक उसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे उस ओढण्यासाठी कारखान्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पहावयास मिळाली मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष दर देण्याची वेळ आली त्यावेळी या कारखान्यांनी वेगवेगळी कारणे सांगत कमी दरात शेतक-यांची बोळवण केली.
 दोन वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या वर्षीच्या गाळपातच छत्रपतीला साजेसा भाव दिला जाईल अशी वल्गना करणा-या सावरगांव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 2 हजार रुपयांप्रमाणे शेतक-यांना पैसे दिले तर तेलगांव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सह. साखर कारखान्याने देखील 2 हजार प्रमाणेच भाव दिला मात्र खाजगी तत्वावर चालणा-या पवारवाडी येथील जय महेश शुगरने शेतक-यांना 2 हजार 600 रुपयांप्रमाणे भाव पहिल्याच हप्त्यात दिला. त्या तुलनेत सहकारी तत्वावरील दोन्ही कारखान्यांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसत चांगलाच मलिदा मिळविला. 
 
शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान 
गेल्या हंगामात सुंदरराव सोळंके कारखान्याने 89 हजार मे.टन., छत्रपती 71 हजार 82 मे.टन तर जय महेशने 1 लाख 31 हजार 500 मे.टन उसाचे गाळप केले सहकारी कारखान्यांनी शेतक-यांना दिलेल्या भावामुळे शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
 
मागील पाच सहा महिन्यांपासुन साखरेचा भाव हा गगनाला भिडलेला असुन तो 3 हजार 500 ते 4 हजार इतका आहे. साखरेला एवढा भाव असतांना देखील त्याच्या अर्धाच भाव शेतक-यांना मिळतो आहे यात कारखाने मोठया प्रमाणावर फायद्यात आहेत मात्र मागील काळातील तुट भरुन काढण्याच्या नावाखाली कारखाने शेतक-यांची लुट करीत आहेत. 
 
भाव वाढवण्याच्या विचारात 
कारखान्याने या वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जास्त भाव दिलेला आहे असे असतांनाही आणखीन भाव वाढवुन देण्याचे कारखाना प्रशासनाच्या विचाराधीन आहे. 
- एम.डी. घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक, सुंदरराव सोळंके सह.साखर कारखाना 
 
जास्त भाव दिला आहे 
आमचा नविन कारखाना असुन आम्हाला बायप्रोडक्टच्या माध्यमातुन कसलेही इतर उत्पन्न मिळत नाही तरी देखील कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा 219 रुपयांनी भाव जास्त दिलेला आहे. 
- आर.एस. शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती सहकारी साखर कारखाना