शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

साखरेचा चांगला भाव असूनही कारखाने देत आहेत ऊसाला कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:28 IST

साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

 बीड/माजलगाव : सन 2016-17 चा गाळप हंगाम सुरु होतांना इतर कारखान्यांच्या तुलनते जास्त भाव देण्याच्या वल्गना करणा-या तालुक्यातील दोन्ही सहकरी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर दिल्याचा कांगावा करीत इतर कारखान्यांपेक्षा प्रतिटन 600 रुपये कमी भाव देऊन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असुन साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. 

 
माजलगांव तालुक्यात सलग तिन वर्षे दुष्काळाची परिस्थिती असतांनाही गेल्या वर्षीच्या हंगामात तालुक्यातील तिन कारखान्यांनी जवळपास 3 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी प्रत्येक कारखान्याकडुन इतर कारखान्यांच्या तुलनेत आम्ही जास्त भाव देवू अशी वल्गना करुन शेतक-यांना आकर्षीत करण्याचे काम केले. मोठया अपेक्षेने शेतक-यांनी या कारखान्यांना आपला उस दिला. वास्तविक उसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे उस ओढण्यासाठी कारखान्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पहावयास मिळाली मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष दर देण्याची वेळ आली त्यावेळी या कारखान्यांनी वेगवेगळी कारणे सांगत कमी दरात शेतक-यांची बोळवण केली.
 दोन वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या वर्षीच्या गाळपातच छत्रपतीला साजेसा भाव दिला जाईल अशी वल्गना करणा-या सावरगांव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 2 हजार रुपयांप्रमाणे शेतक-यांना पैसे दिले तर तेलगांव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सह. साखर कारखान्याने देखील 2 हजार प्रमाणेच भाव दिला मात्र खाजगी तत्वावर चालणा-या पवारवाडी येथील जय महेश शुगरने शेतक-यांना 2 हजार 600 रुपयांप्रमाणे भाव पहिल्याच हप्त्यात दिला. त्या तुलनेत सहकारी तत्वावरील दोन्ही कारखान्यांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसत चांगलाच मलिदा मिळविला. 
 
शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान 
गेल्या हंगामात सुंदरराव सोळंके कारखान्याने 89 हजार मे.टन., छत्रपती 71 हजार 82 मे.टन तर जय महेशने 1 लाख 31 हजार 500 मे.टन उसाचे गाळप केले सहकारी कारखान्यांनी शेतक-यांना दिलेल्या भावामुळे शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
 
मागील पाच सहा महिन्यांपासुन साखरेचा भाव हा गगनाला भिडलेला असुन तो 3 हजार 500 ते 4 हजार इतका आहे. साखरेला एवढा भाव असतांना देखील त्याच्या अर्धाच भाव शेतक-यांना मिळतो आहे यात कारखाने मोठया प्रमाणावर फायद्यात आहेत मात्र मागील काळातील तुट भरुन काढण्याच्या नावाखाली कारखाने शेतक-यांची लुट करीत आहेत. 
 
भाव वाढवण्याच्या विचारात 
कारखान्याने या वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जास्त भाव दिलेला आहे असे असतांनाही आणखीन भाव वाढवुन देण्याचे कारखाना प्रशासनाच्या विचाराधीन आहे. 
- एम.डी. घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक, सुंदरराव सोळंके सह.साखर कारखाना 
 
जास्त भाव दिला आहे 
आमचा नविन कारखाना असुन आम्हाला बायप्रोडक्टच्या माध्यमातुन कसलेही इतर उत्पन्न मिळत नाही तरी देखील कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा 219 रुपयांनी भाव जास्त दिलेला आहे. 
- आर.एस. शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती सहकारी साखर कारखाना