शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘आधार’ असतानाही परीक्षेपासून केले निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:16 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडे आधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडेआधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला. परीक्षार्र्थींकडे आधारसह बँक पासबुक, महाविद्यालयाचे ओळखपत्र असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र परीक्षेचे नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रवेशासाठी आयोगाचे निर्देश काटेकोरपणे पाळण्यात आल्याचे स्पष्ट केले.एमपीएससीतर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन शहरातील १४ केंद्रांवर केले होते. परीक्षेसाठी विद्यार्थी केंद्रांवर हजर झाले असता, त्यांना दोन ओळखपत्रांची मागणी करण्यात येत होती. मात्र अनेकांनी केवळ आधार हेच ओळखपत्र म्हणून सोबत आणले होते. तसेच काही विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स होती. या ओळखपत्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याचा फटका १४ केंद्रांवरील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसला असल्याची माहिती परीक्षार्थी सचिन राठोड याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी दोन ते तीन वर्षांपासून केलेली असताना त्यांना ऐनवेळी दोन ओळखपत्र मागितल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या परीक्षेसाठी ४ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र दाखल केले होते. यातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३ हजार २३१ एवढी आहे. तर अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या १,२७५ आहे. एकूण परीक्षार्र्थींपैकी ७१.७० टक्के विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील तीन परीक्षांपासून परीक्षार्र्थींना दोन ओळखपत्रे दाखविल्याशिवाय परीक्षा केंद्रांत प्रवेश न देण्याचा नियम केला आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकीच दोन ओळखपत्र असणे आवश्यक आहे. दोन ओळखपत्र असणाºया विद्यार्थ्यांना कोठेही अडविण्यात आलेले नाही. मात्र ज्यांच्याकडे एकच ओळखपत्र होते, त्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश देण्यात आलेला नाही.- रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन

 

टॅग्स :examपरीक्षाAdhar Cardआधार कार्ड