शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

सर्वसामान्य आदिवासी न्यायापासून वंचित; राज्यात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा रिक्त

By राम शिनगारे | Updated: July 18, 2022 12:06 IST

१७ हजार जात वैधता प्रमाणपत्रांचे दावे प्रलंबित

- राम शिनगारेऔरंगाबाद : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या महिला आदिवासी उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी होतीलच. देशाचे सर्वोच्च पद अदिवासी महिलेला मिळत आहे ही आनंदाची बाब असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींच्या प्रश्नांकडे कोणत्याही सरकारने पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. सध्या राज्यात आदिवासींच्या विविध विभागांत तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त आहेत. जात पडताळणी समित्यांकडे १७ हजार १८० जात प्रकरणे प्रलंबित आहेत. आता देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या मुर्मू या समाजबांधवांच्या प्रश्नांकडे लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये आदिवासी समाजाच्या ५५ हजार ३१९ जागा जागा आहेत. त्यापैकी तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त असल्याची माहिती तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली होती. या रिक्त जागांविषयी भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे २७ मार्च रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आयोगाचे उपसंचालक आर. के. दुबे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना २५ एप्रिल रोजी पत्र पाठवून सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार २३ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आयोगाला माहिती सदर केली. राज्य शासनाने आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचा दावा आयोगाच्या अभ्यास गटाचे सदस्य राजेंद्र मरसकोल्हे यांनी केला आहे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईनाआदिवासींच्या हक्काच्या जागा गैरआदिवासींनी बळकावल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ऑर्गनायझेशन फाॅर राइट्स ऑफ ट्रायबल संस्थेने याचिका दाखल केली होती. याचिकेच्या निकालात न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत गैरआदिवासींनी बळकावलेल्या जागा रिक्त करून भरण्याचे आदेश दिले होते. यावर राज्य शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय काढला. त्यामध्ये बळकावलेल्या १२ हजार ५०० जागा रिक्त होणार होत्या. मात्र, त्याविषयी अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याचे याचिकाकर्त्या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी सांगितले.

प्रलंबित दावे केव्हा निकाली निघणार?राज्यात आदिवासी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी विविध समित्यांचे गठण केलेले आहे. चालू महिन्यात ठाणे जातपडताळणी समितीसमोर ४९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच पालघर ३५९, पुणे ३९१, नाशिक १०१७, नाशिक दाेनकडे १४२५, नंदुरबार २९०. धुळे २४६०, औरंगाबाद २६६४, किनवट ५६५९, आमरावती ७०२, यवतमाळ ६९३, नागपूर ३१७, नागपूर दोन १८७, गडचिरोली ६० आणि गडचिरोली दोन समितीकडे ४६२ अशी एकूण १७ हजार १८० प्रकरणे प्रलंबित असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र