शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

सर्वसामान्य आदिवासी न्यायापासून वंचित; राज्यात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा रिक्त

By राम शिनगारे | Updated: July 18, 2022 12:06 IST

१७ हजार जात वैधता प्रमाणपत्रांचे दावे प्रलंबित

- राम शिनगारेऔरंगाबाद : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या महिला आदिवासी उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी होतीलच. देशाचे सर्वोच्च पद अदिवासी महिलेला मिळत आहे ही आनंदाची बाब असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींच्या प्रश्नांकडे कोणत्याही सरकारने पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. सध्या राज्यात आदिवासींच्या विविध विभागांत तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त आहेत. जात पडताळणी समित्यांकडे १७ हजार १८० जात प्रकरणे प्रलंबित आहेत. आता देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या मुर्मू या समाजबांधवांच्या प्रश्नांकडे लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये आदिवासी समाजाच्या ५५ हजार ३१९ जागा जागा आहेत. त्यापैकी तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त असल्याची माहिती तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली होती. या रिक्त जागांविषयी भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे २७ मार्च रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आयोगाचे उपसंचालक आर. के. दुबे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना २५ एप्रिल रोजी पत्र पाठवून सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार २३ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आयोगाला माहिती सदर केली. राज्य शासनाने आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचा दावा आयोगाच्या अभ्यास गटाचे सदस्य राजेंद्र मरसकोल्हे यांनी केला आहे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईनाआदिवासींच्या हक्काच्या जागा गैरआदिवासींनी बळकावल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ऑर्गनायझेशन फाॅर राइट्स ऑफ ट्रायबल संस्थेने याचिका दाखल केली होती. याचिकेच्या निकालात न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत गैरआदिवासींनी बळकावलेल्या जागा रिक्त करून भरण्याचे आदेश दिले होते. यावर राज्य शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय काढला. त्यामध्ये बळकावलेल्या १२ हजार ५०० जागा रिक्त होणार होत्या. मात्र, त्याविषयी अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याचे याचिकाकर्त्या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी सांगितले.

प्रलंबित दावे केव्हा निकाली निघणार?राज्यात आदिवासी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी विविध समित्यांचे गठण केलेले आहे. चालू महिन्यात ठाणे जातपडताळणी समितीसमोर ४९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच पालघर ३५९, पुणे ३९१, नाशिक १०१७, नाशिक दाेनकडे १४२५, नंदुरबार २९०. धुळे २४६०, औरंगाबाद २६६४, किनवट ५६५९, आमरावती ७०२, यवतमाळ ६९३, नागपूर ३१७, नागपूर दोन १८७, गडचिरोली ६० आणि गडचिरोली दोन समितीकडे ४६२ अशी एकूण १७ हजार १८० प्रकरणे प्रलंबित असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र