शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सादिलवार खर्चासाठी अनेक शाळा प्रायोजकांवर अवलंबून; शासनाने खर्च देणे केले बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:36 IST

काही वर्षांपासून हा खर्च देणे बंद करण्यात आल्यामुळे प्रत्येक मोठ्या खर्चासाठी या शाळांना प्रायोजकांवर अवलंबून राहावे लागत आहे.  

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : शाळांमध्ये भौतिक सुधारणा करणे, इमारतीची डागडुजी, शालेय साहित्याची खरेदी या सर्व गोष्टींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शासनातर्फे सादिलवार खर्च दिला जायचा. मात्र, काही वर्षांपासून हा खर्च देणे बंद करण्यात आल्यामुळे प्रत्येक मोठ्या खर्चासाठी या शाळांना प्रायोजकांवर अवलंबून राहावे लागत आहे.  

शाळांच्या भौतिक विकासासाठी पूर्वी शैक्षणिक संस्थांना एक विशेष रक्कम दिली जायची. यानंतर २००३ पासून यामध्ये बदल करून शाळांना सादिलवार खर्च देण्यात येत होता. या खर्चाची रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा व्हायची. हा खर्च शाळेतील शिक्षकांच्या एकूण पगाराच्या १२ टक्के असायचा. त्यानंतर या खर्चात कपात होऊन हा खर्च चार टक्क्यांवर आणला गेला आणि २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून हा खर्च देणे पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे पैशाअभावी अनेक शैक्षणिक संस्थांची दुरुस्तीची कामे रखडली असल्याचेही शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.अनेक शाळांना या खर्चासाठी एक  तर प्रायोजकत्व देणाऱ्यांपुढे हात पसरावे लागत आहे किंवा मग हा खर्च पालकांकडून वसूल करावा लागत आहे. आर्थिकदृष्ट्या ज्या शिक्षण संस्था मजबूत आहेत, त्यांना यामुळे विशेष अडचण येत नाही. लहान संस्थांच्या विकासासाठी सादिलवार खर्च बंद होणे मारक ठरलेले आहे. 

वाचन संस्कृतीवरही परिणामविद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीवरही या गोष्टीचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो, असे मत साहित्यिकांनी व्यक्त केले. सादिलवार खर्चातून पुस्तक खरेदीही केली जायची. त्यामुळे शाळेतील ग्रंथालयही अवांतर वाचनाच्या पुस्तकांनी सुसज्ज असायचे; पण आता हा खर्च मिळत नसल्याने अभ्यासक्रमांशी संबंधित पुस्तके घेतानाही अनेक संस्थांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये ग्रंथालयेच नाहीत

शालेय शिक्षणावर अधिक रक्कम खर्च करावीविद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्यामुळे शालेय शिक्षणावर मोठी रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. १९६५ साली आलेल्या कोठारी आयोगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जीडीपीच्या ६ ते ६.५ टक्के रक्कम शालेय शिक्षणावर खर्च व्हावी, अशी सूचना केली होती. आज पन्नास वर्षांपेक्षाही अधिक क ाळ उलटून गेला आहे. तरीही शालेय शिक्षणावर खर्च होणारी रक्कम जीडीपीच्या अडीच ते सव्वातीन टक्के यादरम्यानच आढळून येते. काळानुसार विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पुरविण्यासाठी संस्थांकडे पैसे असणे आवश्यक आहे. त्यामुळे सादिलवार खर्च देणे तर सुरू करावेच; पण सोबतच शालेय शिक्षणावर करण्यात येणाऱ्या एकूण खर्चातही वाढ करावी.-एस.पी. जवळकर

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाfundsनिधीState Governmentराज्य सरकार