शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी-जास्त होतील, १४ चौकांत स्मार्ट सिग्नल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 20:10 IST

महापालिका प्रशासन दोन कोटी रुपये खर्च करणार

छत्रपती संभाजीनगर : शहरात बहुतांश चौकातील सिग्नल बंद आहेत. काही ठिकाणी तर वाहनधारकांना सिग्नलच दिसत नाही. टायमर घड्याळी नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासनाने १४ ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सिग्नलमुळे वाहनधारकांचा वेळ, इंधनाची बचत होईल. त्याचप्रमाणे प्रदूषणही घटेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांनी मनपाकडे सिग्नल दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. वाहतूक पोलिसांना लागणारे साहित्य, सिग्नलची यंत्रणा उभारण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी सांगितले की, गरवारे चौकात स्मार्ट सिग्नल सुरू केले आहे. या अत्याधुनिक सिग्नलचा वाहनधारकांना बराच फायदा होत आहे. याच पद्धतीचे शहरात अन्य सिग्नल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. एका सिग्नलच्या उभारणीसाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

नवीन सिग्नलचे फायदेस्मार्ट सिग्नलमुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी-जास्त होतील. वाहन चालकांना दूरवरून सिग्नल दिसतील. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांचे इंजिन बंद केले जात नाही. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. वाहनांच्या वर्दळीनुसार इंजिन बंद करावे लागेल. प्रदूषणातही घट होईल.

या चाैकात बसविणार सिग्नलसिल्लेखाना, शरद टी पॉइंट, हॉटेल कार्तिकी चौक, धूत हॉस्पिटल चौक, रेल्वे स्टेशनसमोरील चौक, महानुभव आश्रम चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक, समर्थनगर चौक, गजानन महाराज मंदिर चौक, केंब्रिज चौक, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, भाई उद्धवराव पाटील चौक, सावरकर चौक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका