शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

शहराला डेंग्यूचा 'महाविळखा'; आणखी दोघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 16:44 IST

औरंगाबाद शहरात दीड महिन्यात मृतांची संख्या ९ वर 

ठळक मुद्देनारेगावातील ७ वर्षीय बालकगणेश कॉलनीतील २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात डेंग्यूचा ‘महाविळखा’ कायम असून, मंगळवारी घाटी रुग्णालयात ७ वर्षीय बालकाचा आणि खाजगी रुग्णालयात २७ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना डेंग्यूनेमृत्यू झाला. कामरान शरीफ शेख (७, रा. नारेगाव) आणि शेख सैफुल्लाह सलिमुल्लाह (२७, रा. गणेश कॉलनी, रशीदपुरा) अशी मृत्यू पावलेल्या रुग्णांची नावे आहेत.

कामरान शरीफ शेख याला १० नोव्हेंबर रोजी उपचारासाठी घाटीतील बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक-२५ मध्ये दाखल केले होते. त्याच्या प्लेटलेट २२ हजारांपर्यंत खाली आल्या होत्या. डेंग्यूचा एनएस-१ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपचाराकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दुसरीकडे शेख सैफुल्लाह सलिमुल्लाह याला ११ नोव्हेंबर रोजी रात्री एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. राघवन म्हणाले, सदर रुग्णावर आधी दोन खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान डेंग्यू शॉक सिंड्रोमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. घाटीतील बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे म्हणाल्या, सदर बालक डेंग्यू पॉझिटिव्ह होता. प्लेटलेट कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांविषयी माहिती घेतली जाईल, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. डेंग्यूच्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेटसाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन्ही रुग्णांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. प्लेटलेटचा तुटवडा दूर होण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्यासह प्लेटलेट तयार होण्यासाठी रक्तपेढ्यांनी प्राधान्य  देणे आवश्यक आहे. 

लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने यंत्रणा सुस्त नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यूचा उद्रेक वाढत असताना, महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सध्या लोकप्रतिनिधी सरकार स्थापन आणि राजकीय उलथापालथीत मग्न झालेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कोणाचीही नजर नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी शासकीय अधिकाºयांना धारेवर धरणारे लोकप्रनिधी सध्या गायब आहेत. त्यामुळे यंत्रणा सुस्त झाली आहे. परिणामी, आणखी किती जणांचा बळी डेंग्यू घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. 

बळींची संख्या यापेक्षा अधिक ?शहरात सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत डेंग्यूने ७ जणांचा बळी गेला होता. या दोन मृत्यूमुळे डेंग्यूने मृत्यू पावणाºयाची संख्या ९ वर गेली आहे. गेल्या महिनाभरात काही संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला; परंतु हे रुग्ण डेंग्यूचे नसून इतर आजारांचेच असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. खाजगी रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, ही आक डेवारी समोर येऊ दिली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे डेंग्यूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ९ पेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बालकांवर उपचार सुरूतापासह डेंग्यू संशयित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. घाटीत डेंग्यू आणि डेंग्यू संशयित रुग्णांनी वॉर्ड भरलेले आहे. बालरोग विभागात ३ संशयित रुग्ण मुलांवर उपचार सुरू आहे. खाजगी रुग्णालयांत तर उपचार घेणाºयांची रुग्णसंख्या कितीतरी अधिक आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू