शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शहराला डेंग्यूचा 'महाविळखा'; आणखी दोघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 16:44 IST

औरंगाबाद शहरात दीड महिन्यात मृतांची संख्या ९ वर 

ठळक मुद्देनारेगावातील ७ वर्षीय बालकगणेश कॉलनीतील २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात डेंग्यूचा ‘महाविळखा’ कायम असून, मंगळवारी घाटी रुग्णालयात ७ वर्षीय बालकाचा आणि खाजगी रुग्णालयात २७ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना डेंग्यूनेमृत्यू झाला. कामरान शरीफ शेख (७, रा. नारेगाव) आणि शेख सैफुल्लाह सलिमुल्लाह (२७, रा. गणेश कॉलनी, रशीदपुरा) अशी मृत्यू पावलेल्या रुग्णांची नावे आहेत.

कामरान शरीफ शेख याला १० नोव्हेंबर रोजी उपचारासाठी घाटीतील बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक-२५ मध्ये दाखल केले होते. त्याच्या प्लेटलेट २२ हजारांपर्यंत खाली आल्या होत्या. डेंग्यूचा एनएस-१ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपचाराकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दुसरीकडे शेख सैफुल्लाह सलिमुल्लाह याला ११ नोव्हेंबर रोजी रात्री एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. राघवन म्हणाले, सदर रुग्णावर आधी दोन खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान डेंग्यू शॉक सिंड्रोमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. घाटीतील बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे म्हणाल्या, सदर बालक डेंग्यू पॉझिटिव्ह होता. प्लेटलेट कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांविषयी माहिती घेतली जाईल, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. डेंग्यूच्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेटसाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन्ही रुग्णांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. प्लेटलेटचा तुटवडा दूर होण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्यासह प्लेटलेट तयार होण्यासाठी रक्तपेढ्यांनी प्राधान्य  देणे आवश्यक आहे. 

लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने यंत्रणा सुस्त नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यूचा उद्रेक वाढत असताना, महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सध्या लोकप्रतिनिधी सरकार स्थापन आणि राजकीय उलथापालथीत मग्न झालेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कोणाचीही नजर नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी शासकीय अधिकाºयांना धारेवर धरणारे लोकप्रनिधी सध्या गायब आहेत. त्यामुळे यंत्रणा सुस्त झाली आहे. परिणामी, आणखी किती जणांचा बळी डेंग्यू घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. 

बळींची संख्या यापेक्षा अधिक ?शहरात सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत डेंग्यूने ७ जणांचा बळी गेला होता. या दोन मृत्यूमुळे डेंग्यूने मृत्यू पावणाºयाची संख्या ९ वर गेली आहे. गेल्या महिनाभरात काही संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला; परंतु हे रुग्ण डेंग्यूचे नसून इतर आजारांचेच असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. खाजगी रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, ही आक डेवारी समोर येऊ दिली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे डेंग्यूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ९ पेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बालकांवर उपचार सुरूतापासह डेंग्यू संशयित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. घाटीत डेंग्यू आणि डेंग्यू संशयित रुग्णांनी वॉर्ड भरलेले आहे. बालरोग विभागात ३ संशयित रुग्ण मुलांवर उपचार सुरू आहे. खाजगी रुग्णालयांत तर उपचार घेणाºयांची रुग्णसंख्या कितीतरी अधिक आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू