शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:21 IST

पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला.

औरंगाबाद : पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला आणि ४४ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे ठरले.

राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई तंत्रनिकेतन, एमआयडीसी चिकलठाणा येथे तीनदिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण सभापती मीना शेळके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी बी. बी. चव्हाण, साई तंत्रनिकेतन संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव, विनायक बोरसे, प्राचार्य अरुण सातपुते, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांची उपस्थिती होती.

या प्रदर्शनात औरंगाबाद शहरासह विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी ६२ प्रयोग सादर केले आहेत. शैक्षणिक संसाधने, लोकसंख्या शिक्षण या विषयावर शिक्षकांनी २६, व्यवसाय शिक्षण या विषयावर ७, तर प्रयोगशाळा सहायक या विभागात ३ प्रयोग सादर करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. १९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.

कृषी आणि जैविक शेती, आरोग्य आणि स्वच्छता, संसाधन व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि दळणवळण (संप्रेषण), गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी देण्यात आले होते. यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कृषी आणि जैविक शेती, संसाधन व्यवस्थापन या विषयावरील प्रयोग सादर केले आहेत.चौकट :जैविक प्लास्टिक या विषयावर वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर या शाळेने सादर केलेला प्रयोग नावीन्यपूर्ण होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी मक्याचे पीठ, व्हिनेगर, ग्लिसरीन आणि पाणी या पदार्थांपासून प्लास्टिकसारखे गुणधर्म असणारी भांडी तयार केली.पैठण येथील आर्य चाणक्य विद्यामंदिर शाळेने बॉटल ट्री गार्ड उपक रण तयार केले. प्लास्टिकच्या जुन्या बाटल्यांपासून बनविलेले ट्री गार्ड झाडांभोवती बसविल्यामुळे अत्यंत कमी पाण्यातही झाडाला योग्य पाणीपुरवठा कसा होऊ शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

 

टॅग्स :scienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद