शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके ! ८ नोव्हेंबरपासून लेबर कॉलनी क्वार्टर्सवर बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 19:35 IST

सदनिकांमध्ये राहणाऱ्यांना प्रशासनाने दिली आठ दिवसांची नोटीस

औरंगाबाद : विश्वासनगर, लेबर कॉलनी येथील २० एकर जागेतील शासकीय इमारती धोकादायक आणि राहण्यास योग्य नसल्याने त्यावर ८ नोव्हेंबर रोजी बुलडोझर फिरविण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने महापालिका, बांधकाम विभागाने रविवारी रात्री जारी केली. तेथील रहिवाशांना आठ दिवसांत सदनिका खाली कराव्या लागणार आहेत.

दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके प्रशासकीय यंत्रणा फोडणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या काळात लेबर कॉलनी क्वार्टर्सबाबत निर्णय झाला होता. परंतु लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे ती संचिका धूळखात पडली होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सरकारी जागा ताब्यात घेण्यासाठी पाऊल टाकले आहे.शासनाची मालमत्ता बेकायदेशीरपणे विक्री करून व शासकीय मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. नोटीसवर मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. खडेकर यांची नावे आहेत.

विश्वासनगर येथे ३३८ सदनिका आहेत. १९५३-५४ व १९८० ते १९९१ या कालावधीमध्ये सा. बां. विभागाने बांधलेल्या संपूर्ण निवासस्थानांची देखभाल १९५३-५४ पासून करण्यात येत आहे. १९८५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढलेले आहेत. ते आदेश सर्व न्याय संस्थांनी कायम ठेवले आहेत. २००४ मध्ये बांधकाम विभागाने सदनिकाधारकांना नोटीसही बजावली होती. या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चर ऑडिटही करण्यात आले आहे. त्यामुळे त्या इमारती पाडाव्या लागणार आहेत.

ती पूर्ण जागा शासनाचीशासकीय सेवा निवासस्थानांमध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या व शासकीय निवासस्थानांची बेकायदेशीर विक्री व भाडे कराराने हस्तांतरण करणाऱ्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. ती जागा शासनाची आहे. त्यामुळे तेथे अतिक्रमण करून राहणे ही फसवणूकच आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात तेथे राहणाऱ्यांचे अपील फेटाळण्यात आले आहे.

ही एक प्रकारची फसवणूकचशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना १९८०-८१ पूर्वी तात्पुरत्या काळासाठी सदनिका दिल्या होत्या. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. काही जण मयत झाले. तरीही अनेकांनी बांधकाम विभागाकडे सदरील जागेचे हस्तांतरण केलेले नाही. त्यांच्या वारसांनी त्या निवासस्थानात पोटभाडेकरू ठेवले. घरकुल विकले. ही एक प्रकारची फसवणूक आहे, असे प्रशासकीय नोटिसीत नमूद आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद