शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

महावितरणच्या उच्चदाब वितरण योजनेला लाचखोरीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 13:52 IST

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागितले जातात शेतकऱ्यांकडे पैसे

ठळक मुद्देया योजनेत १ किंवा २ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील १६ हजार १८५ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणसमोर उद्दिष्ट

औरंगाबाद : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. वीज जोडणीसाठी कंत्राटदारांकडून पैशाची मागणी करून अडवणूक केली जात असल्याची तक्रार दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

महावितरणकडे मार्च-२०१८ पर्यंत कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या राज्यातील जवळपास सव्वादोन लाख शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी केली होती. या योजनेत १ किंवा २ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, असा दावा महावितरणने केला आहे. या योजनेद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील ६ हजार १०१ व जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना वीज देण्यात येणार आहे. 

या दोन्ही जिल्ह्यांतील १६ हजार १८५ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणसमोर उद्दिष्ट आहे. मात्र, आतापर्यंत अवघ्या १११ शेतकऱ्यांना जोडणी मिळाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत दोन्ही जिल्ह्यांत ६ हजार ५९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. मात्र, आतापर्यंत अवघ्या १०६ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. या दोन्ही योजनेत वीजजोडणी देण्याचा एवढा संथगतीने प्रवास असेल, तर ‘एचव्हीडीएस’मध्ये १६ हजार शेतकऱ्यांना तसेच सौरपंप योजनेत ६ हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुरुवातीला काम परवडत नाही म्हणत कंत्राटदारांनी अनेक महिने निविदांवरच बहिष्कार टाकला होता. अखेर कंत्राटदारांची मनधरणी करीत महावितरणने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. कार्यारंभ आदेश दिले. काही ठिकाणी या योजनेची कामे सुरू झाली आणि आता काही कंत्राटदारांकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार देऊनही त्यांनी दखल घेतली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदरील शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. 

दोन दिवसांत चौकशी करणारयासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले, कंत्राटदारांकडून पैसे मागितले जातात, अशी शेतकऱ्यांकडून थेट तक्रार प्राप्त झालेली नाही. ‘एचव्हीडीएस’ व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत पैशामुळे शेतकऱ्यांची कंत्राटदार अडवणूक करीत असल्याची पैठण तालुक्यातील काही कार्यकर्त्यांची तक्रार आहे. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन याबाबतची चौकशी केली जाणार आहे. 

टॅग्स :agricultureशेतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीelectricityवीजgovernment schemeसरकारी योजना