शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

आनंददायक ! औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:39 IST

जुलै महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ

ठळक मुद्दे2006 नंतर पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

- श्रीकांत पोफळेकरमाड  : औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेले गारखेडा (ता.औरंगाबाद) येथील सुखना धरण ३१ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले. 2006 नंतर पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. मागील वर्षी याच दिवशी हे धरण पूर्ण कोरडे होते. जुलै महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

औरंगाबाद तालुक्यात बनगाव येथील लहुकी , लाडसावंगी येथील बाबुवाडी , दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव आदी धरणे आहेत. दरम्यान, यात सुखना धरण सर्वात मोठे आहे. यावर्षी सगळीकडेच पावसाळ्याच्या सुरूवातीपासुनच चांगले पर्जन्यमान राहिले आहे. सुखना नदीच्या उगमावरही सुरूवातीपासुन चांगला पाऊस होत असल्याने कोरड्याठाक पडलेल्या या सुखना धरणात दोन महिन्यांतच शंभर टक्के पाणीसाठा झाला. 

मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात या धरणात फक्त 15% पाणीसाठा उपलब्ध होता. तत्पूर्वी तर ते कोरडे होते व त्यानंतर उन्हाळ्यापुर्वीच ते पुन्हा कोरडे पडले होते. दरम्यान, आता ते पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचक्रोशीसह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे. सांडव्यातुन पाणी वाहतानाचे व धरणातील पाणीसाठ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गारखेडा येथे रोजच बघ्यांची मोठी प्रमाणात गर्दी होत आहे.

या भागातील पिंप्रीराजा व  आडगाव खुर्द हा परिसर 25 वर्षापुर्वी याच धरणाच्या भरोशावर मोसंबीचे माहेर घर बनला होता. या धरण व आसपासच्या परिसरात सुमारे तीन हजार शेतकर्‍यांनी आपल्या विहीर खोदून येथून कमीत-कमी तीन ते पंधरा किलोमीटर अंतरावर पाईपलाईन नेल्या आहेत. याशिवाय 15 ते 20 गावालाही येथून पाणीपुरवठा होतो. यावर खासगी शेतकर्‍यांचे व शासकीय योजना मिळुन कोट्यावधी रूपये खर्च झालेले आहेत. तथापि, मागील कित्येक वर्षांपासुन हे धरण नेहमीच कोरड्या अवस्थेत राहत असल्याने पुर्वीचे बागायतदार आता कोरडवाहू शेतकरी बनले आहेत. शिवाय शेती तोट्यात गेली ती वेगळीच. उभारणीपासुन विभागाकडे असलेल्या सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत हे धरण फक्त सहा वेळाच पूर्ण क्षमतेने भरले आहे.

धरण पाळूला बाभूळ व इतर काटेरी झाडांचा धोका

पाटबंधारे विभागाकडुन दरवर्षी दुरूस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते. वास्तविक पाहता किरकोळ डागडुजी व कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यापुरत्याच झाडांची कत्तल होत असते. आजस्थितीत मुख्य पाळुवर मोठ-मोठया सुबाभूळ, इतर काटेरी झाडी मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे भविष्यात धरणाला तडे जाऊन मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा गारखेडा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र, संबंधित यंत्रणेच्या पाहणीतुन धरण पुर्णपणे सुरक्षित असुन थोडया फार प्रमाणात काटेरी झुडपे आहेत व ती ही लवकरच काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

दोनच महिन्यात धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने आता डाळींब मोसंबीच्या बागांसाठी उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागणार नाही. शिवाय परिसरातील पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध होईल याचे समाधान आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने अनावश्यक झाडांची त्वरीत कत्तल करावी. - काकासाहेब चौधरी, शेतकरी गारखेडा.

धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सात वर्षापुर्वी विहीर खोदत पाईपलाईन आणत लाखो रूपये खर्च केले. परंतु, एकदाही धरण 30 टक्क्याच्यावर न भरल्याने खर्च करून देखील फारसा उपयोग होत नव्हता. आता धरण भरल्याने त्याचा निश्चित फायदा होणार आहे. - दीपक पोफळे , शेतकरी हिवरा.

◆धरणाविषयी माहिती● स्थापना  :  1965● साठवण क्षमता :  21.35 दशलक्ष● घनमीटर जिवंत साठा : 18.52 दलघमी● मृतसाठा : 2.85 दलघमी

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस