शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:55 IST

जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: राज्यात अनेक प्रश्न आहेत. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आठ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले  नाही. यामुळे तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षात नेतृत्व कोणी करावे ,यावर संभ्रम असल्यानेच सत्ता स्थापन होण्यास विलंब होत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरेाधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, निवडणुकीत जय-परायजय ही प्रक्रिया आहे. पण जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसनेही याविषयी  स्पष्ट भूमिका  घेतली  आहे. उपोषण करीत असलेले  बाबा आढाव हे एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची दखल शासनाने घ्यावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये  देण्याची घोषणा महायुतीने केली होती. पण आम्ही तर म्हणतो की, लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला हवे. असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी आपण  वैयक्तिक भाष्य केलेले नाही. तर शिवसेनेची भूमिका म्हणून बोललो असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.   

दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय तेच घेऊ शकातातमनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, याविषयी चर्चा सुरू आहे, हा निर्णय होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले की, हे दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही त्यांच्या भूमिकेत का पडावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा