शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:55 IST

जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: राज्यात अनेक प्रश्न आहेत. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आठ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले  नाही. यामुळे तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षात नेतृत्व कोणी करावे ,यावर संभ्रम असल्यानेच सत्ता स्थापन होण्यास विलंब होत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरेाधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, निवडणुकीत जय-परायजय ही प्रक्रिया आहे. पण जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसनेही याविषयी  स्पष्ट भूमिका  घेतली  आहे. उपोषण करीत असलेले  बाबा आढाव हे एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची दखल शासनाने घ्यावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये  देण्याची घोषणा महायुतीने केली होती. पण आम्ही तर म्हणतो की, लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला हवे. असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी आपण  वैयक्तिक भाष्य केलेले नाही. तर शिवसेनेची भूमिका म्हणून बोललो असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.   

दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय तेच घेऊ शकातातमनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, याविषयी चर्चा सुरू आहे, हा निर्णय होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले की, हे दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही त्यांच्या भूमिकेत का पडावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा