शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

पदवी परीक्षांना गोंधळानेच सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून (दि.१५) सुरुवात झाली. परीक्षेचे नियोजन, समन्वयाचा अभाव पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाला. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीही परीक्षा केंद्रांमध्ये केलेल्या बदलांमुळे औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देविद्यापीठ : बदलेल्या केंद्रांमध्ये समन्वयाचा अभाव; कुलगुरू, प्रकुलगुरू परीक्षा केंद्रांच्या भेटीला

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून (दि.१५) सुरुवात झाली. परीक्षेचे नियोजन, समन्वयाचा अभाव पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाला. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीही परीक्षा केंद्रांमध्ये केलेल्या बदलांमुळे औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सुविधा नसलेल्या ठिकाणी केंद्र दिल्यामुळे परीक्षा सुरू होण्यासही उशीर झाला. कुलगुरू, प्रकुलगुरू यांनी पहिल्यांदाच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये २२५ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.सह इतर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेला तब्बल ३ लाख ७ हजार विद्यार्थी बसले आहेत. शनिवारी, रविवारीसुद्धा विविध ठिकाणची परीक्षा केंद्रे बदलण्यात आली. शुक्रवारी जाहीर केल्यानुसार २१९ परीक्षा केंदे्र होती. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यात भर घालून ती २२५ वर पोहोचल्याचे परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. शहरातील एमआयटी महाविद्यालयातील काही विद्यार्थी एमजीएम वृत्तपत्र, वसंतराव नाईक महाविद्यालयात, तर पडेगावच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थी इतरत्र परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आले. जालन्यातही तीन परीक्षा केंद्रांवर मोठा गोंधळ झाल्याची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिली. एमजीएम वृत्तपत्र महाविद्यालयात सुरुवातीला ९० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिले होते. सकाळी ९ वाजता ऐनवेळी २०० विद्यार्थी वाढविले. याची महाविद्यालय प्रशासनाला खबरही नव्हती. या वाढविलेल्या विद्यार्थ्यांकडे पूर्वीच्या परीक्षा केंद्रातील हॉल तिकीट होते. या गोंधळामुळे तब्बल एक तासाने परीक्षेला सुरुवात झाली. ही परीक्षा विनानंबरचीच घेण्यात आली. सिद्धार्थ महाविद्यालयातील काही विद्यार्थी इतरत्र पाठविले. विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी पूर्वीच्याच केंद्रावर हजेरी लावली. मात्र त्याठिकाणी त्यांचे नंबरच नव्हते. यात काही विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाल्याचे कळते. मात्र त्यास विद्यापीठ प्रशासनाने दुजोरा दिला नाही.हॉल तिकीट डाऊनलोड झालेच नाहीतवाळूज येथील हायटेक महाविद्यालयातील बीसीए, बीबीए अभ्यासक्रमांच्या काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट परीक्षेच्या दिवशीही डाऊनलोड झाले नव्हते. यात पालकांनी गोंधळ घातल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र सर्व परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत कोणालाही परीक्षेपासून वंचित ठेवले नसल्याची माहिती प्राचार्य डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाने याविषयी बोलताना संबंधित महाविद्यालयाने अतिरिक्त प्रवेश दिल्याचा आरोप केला. मात्र प्राचार्य डॉ. भालेराव यांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादीच जाहीर करून एकही विद्यार्थी अतिरिक्त नसल्याचे स्पष्ट केले.कुलगुरूंच्या उपस्थितीत परीक्षा नियमांचा भंगकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शहरातील स.भु., मौलाना आझाद, विवेकानंद, देवगिरी महाविद्यालयांतील केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांचा अनधिकृतपणे वावर होता. परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई असतानाही शितोळे यांनी फोटोसेशन केले. परीक्षा केंद्रांना भेट दिल्याची छायाचित्रे शितोळे यांनी प्रसिद्धीसाठी पाठविली आहेत. शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी चौका, सावंगी आणि फुलंब्री येथील महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन १२ विद्यार्थ्यांना कॉप्या करताना पकडले.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा