शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटपाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत. यात दोषी असणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठातांना निलंबित करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

ठळक मुद्देकारभारावर लोकप्रतिनिधी संतप्त : बदनामीस जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत. यात दोषी असणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठातांना निलंबित करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचा भंडाफोड ‘लोकमत’च्या शनिवारच्या (दि.१४) अंकात करण्यात आला. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, तरच अशा प्रकारांना आळा बसेल, असेही मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सांगितले. आमदार सुभाष झांबड म्हणाले की, विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीला लागताना अगोदरच दुजाभाव सहन करावा लागतो. यात पुन्हा अशा प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी झाली, याचा जाब विधिमंडळात विचारला जाईल. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर म्हणाले की, हा फौजदारी गुन्हा आहे. दोषींना सोडले जाणार नाही. विधिमंडळात अधिकाºयांच्या निलंबनाच्या घोषणेशिवाय शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सोमवारी विविध विद्यार्थी, प्राध्यापक संघटना आंदोलन करणार आहेत.प्रशासनाची बेफिकिरी कायमविद्यापीठाला शनिवारी (दि.१४) अधिकृत सुटी असल्यामुळे बहुतांश अधिकारी फिरकलेच नाहीत. गंभीर प्रकरण उघडकीस येऊनही कुलगुरू कळंब येथील नियोजित दौºयावर सकाळीच रवाना झाले. परीक्षा संचालकांना काही सहकाºयांना निरोप देऊन आॅफिसला येण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, परीक्षा संचालक सायंकाळी ४ वाजेपर्यंत आले नव्हते. प्रकुलगुरू काही वेळेसाठी कार्यालयात आले होते. अधिष्ठातांपैकी एक जणच विद्यापीठात होता. यामुळे प्रशासनाची बेफिकिरी शनिवारी दिसून आली.दोषी कोण?नापास विद्यार्थ्यांना पदव्या पाठविण्याच्या प्रकरणात दोषी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच पदव्यांच्या छपाईचे आऊटसोर्सिंग केले आहे. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असलेल्या प्रिंटिंग प्रेसऐवजी खाजगी कंपनीला कशामुळे प्राधान्य देण्यात आले. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये विद्यापीठास उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांचा पुरवठा करणाºयाच पुणेस्थित कंपनीलाच प्राधान्य देण्यात आले. हे देताना त्या कंपनीला चढ्या दराने निविदा देण्यास कोण आग्रही होते. प्रति पदवी २७ रुपयांऐवजी ९० रुपये देण्याच्या सूचना कोणी मांडल्या आदी मुद्यांवर चर्चा होत आहे.कुलगुरूंच्या अडचणी वाढणारविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्यपालांनी माजी कुलगुरू एस.एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. चार कोटींची उचल, बारकोड उत्तरपत्रिकांची विनानिविदा खरेदी, अधिकार मंडळावरील नियुक्त्यांमुळे अगोदरच अडचणीत असलेल्या कुलगुरूंच्या समस्या या प्रकारामुळे वाढणार आहेत.\\\शिक्षण असो की उच्चशिक्षण या विभागांचा ‘विनोद’ झाला आहे. औरंगाबाद विद्यापीठ असो की, मुंबई विद्यापीठ. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. औरंगाबादच्या विद्यापीठाबाबत तर अनेक तक्रारी असून, नापास विद्यार्थ्यांना पदव्या देणे हा तर अंधळा कारभार म्हणावा लागेल. औरंगाबादच्या विद्यापीठातील सावळ्या गोंधळाबाबत अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे.-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी