शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...आता ऑलिम्पिकमध्ये औरंगाबादचे खेळाडू खेळतील; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी ॲस्ट्रो टर्फ, स्विमिंग पूलचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:17 IST

नेक केंद्रात तीन किंवा चारच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मात्र, औरंगाबाद येथील केंद्रात सात क्रीडा प्रकार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील 'साई' केंद्रास आधुनिक क्रीडा साहित्य खरेदीसाठी ५ कोटी२०२४ व २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये औरंगाबाद येथील केंद्रातील १० ते २० खेळाडू खेळतील.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्राची प्रशंसा करताना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी या केंद्रातील ७ क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम क्रीडा साहित्य खरेदीसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. आपण औरंगाबाद येथे येण्याआधीच मान्यता दिली असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले. 

विद्यापीठ परिसरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील हाॅकी खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रो टर्फ आणि स्विमिंग पूलचा लोकार्पण सोहळा गुरुवारी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. या प्रसंगी ते बोलत होते. त्याआधी त्यांच्या हस्ते तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे येथील वेटलिफ्टिंग हॉल व मल्टिपर्पज हॉलची पाहणीही त्यांनी केली. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, विद्यापीठाचे कुलगुरु प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद येथील केंद्र किती महत्त्वाचे आहे हे रिजीजू यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेक केंद्रात तीन किंवा चारच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मात्र, औरंगाबाद येथील केंद्रात सात क्रीडा प्रकार आहे. येथील जिम्नॅस्टिकचे केंद्र बंद करण्यात आले होते. मात्र, आम्ही पुन्हा येथील जिम्नॅस्टिकचे केंद्र सुरु केले आहे. २०२४ व २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये औरंगाबाद येथील केंद्रातील १० ते २० खेळाडू खेळतील. येथील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम अत्याधुनिक साहित्यासाठी ५ कोटी रुपयाची मान्यता येथे येण्याआधीच दिलेली आहे. तसेच ३०० बेड हॉस्टेलला २८ कोटी, हॉकी टर्फला ४ कोटी ८४ लाख आणि फेन्सिंग हॉलसाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

यावेळी ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये १३८ कोटींची जनता असताना आपल्याला एक रौप्य अथवा एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागते. भारतात आमची खेळात चांगली परंपरा आहे. मात्र, आमची खेळाची संस्कृती बनली नाही. पदक जिंकल्यानंतर जेव्हा राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तेव्हा हे यश सर्व देश साजरा करतो व आनंदाची लहर निर्माण होते. खेळच हा एकजूटता व ताकद निर्माण करु शकतो. त्यामुळे देशात ‘खेलो इंडिया’ व ‘फिट इंडिया’ ही चळवळ सुरु करण्यात आली. खा. भागवत कराड आणि इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथील केंद्रात एनआयएस डिप्लोमा कोर्स, ॲथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकची मागणी केली. हा धागा पकडताना रिजीजू यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल, असा शब्द दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSwimmingपोहणे