शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

...आता ऑलिम्पिकमध्ये औरंगाबादचे खेळाडू खेळतील; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी ॲस्ट्रो टर्फ, स्विमिंग पूलचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:17 IST

नेक केंद्रात तीन किंवा चारच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मात्र, औरंगाबाद येथील केंद्रात सात क्रीडा प्रकार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील 'साई' केंद्रास आधुनिक क्रीडा साहित्य खरेदीसाठी ५ कोटी२०२४ व २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये औरंगाबाद येथील केंद्रातील १० ते २० खेळाडू खेळतील.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्राची प्रशंसा करताना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी या केंद्रातील ७ क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम क्रीडा साहित्य खरेदीसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. आपण औरंगाबाद येथे येण्याआधीच मान्यता दिली असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले. 

विद्यापीठ परिसरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील हाॅकी खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रो टर्फ आणि स्विमिंग पूलचा लोकार्पण सोहळा गुरुवारी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. या प्रसंगी ते बोलत होते. त्याआधी त्यांच्या हस्ते तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे येथील वेटलिफ्टिंग हॉल व मल्टिपर्पज हॉलची पाहणीही त्यांनी केली. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, विद्यापीठाचे कुलगुरु प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद येथील केंद्र किती महत्त्वाचे आहे हे रिजीजू यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेक केंद्रात तीन किंवा चारच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मात्र, औरंगाबाद येथील केंद्रात सात क्रीडा प्रकार आहे. येथील जिम्नॅस्टिकचे केंद्र बंद करण्यात आले होते. मात्र, आम्ही पुन्हा येथील जिम्नॅस्टिकचे केंद्र सुरु केले आहे. २०२४ व २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये औरंगाबाद येथील केंद्रातील १० ते २० खेळाडू खेळतील. येथील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम अत्याधुनिक साहित्यासाठी ५ कोटी रुपयाची मान्यता येथे येण्याआधीच दिलेली आहे. तसेच ३०० बेड हॉस्टेलला २८ कोटी, हॉकी टर्फला ४ कोटी ८४ लाख आणि फेन्सिंग हॉलसाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

यावेळी ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये १३८ कोटींची जनता असताना आपल्याला एक रौप्य अथवा एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागते. भारतात आमची खेळात चांगली परंपरा आहे. मात्र, आमची खेळाची संस्कृती बनली नाही. पदक जिंकल्यानंतर जेव्हा राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तेव्हा हे यश सर्व देश साजरा करतो व आनंदाची लहर निर्माण होते. खेळच हा एकजूटता व ताकद निर्माण करु शकतो. त्यामुळे देशात ‘खेलो इंडिया’ व ‘फिट इंडिया’ ही चळवळ सुरु करण्यात आली. खा. भागवत कराड आणि इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथील केंद्रात एनआयएस डिप्लोमा कोर्स, ॲथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकची मागणी केली. हा धागा पकडताना रिजीजू यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल, असा शब्द दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSwimmingपोहणे