शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भूजल पातळीत दरवर्षी दोन मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:38 IST

पाच वर्षांत १२ मीटरने पातळी खालावली, यंदा दोन मीटरची भर

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्यापाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अधिक जटिल होताना दिसत आहे. 

भूजल सर्वेक्षणतर्फे जिल्ह्यातील १४१ स्थिर निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीची गत ५ वर्षांतील सरासरी आकडेवारी घेतली असता धक्कादायक अवस्था दिसते आहे. मागील पाच वर्षांत भूजल पातळी सरासरी ११.४८ मीटर (४० फूट) खोल गेली. यंदा २०१९ मार्च महिन्यात ही पाणी पातळी आणखी दोन मीटरने खालावली आहे. जमिनीतील पाणी पातळीत वाढ किंचितही जाणवत नसून, ती वरच्या वर पुन्हा खालावत असल्याचे भयावह चित्र समोर आहे.

उन्हाचा पारा वाढला असून, जमिनीतील पाणी पातळीत झपाट्याने घट झालेली आहे. मे महिन्याची सुरुवात झाली असून, यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी अद्याप काही सांगता येत नाही. दरवर्षीचा हवामानाचा अंदाज अचूक ठरला नसल्याने शेतकरीही चिंतातुरच आहेत. सध्याच चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यातही टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. जनावरांच्या चारा छावण्या सुरू झाल्या आहेत; परंतु पाणी प्रश्न सतावतो आहे. 

याविषयी कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड म्हणाले की, भूजल पातळीची मागील ५ वर्षांतील स्थिर भूजल पातळीशी तुलनात्मक स्थिती तपासली आहे. त्यात सतत घट दिसते आहे. मे महिन्यातील शेवटी पुन्हा स्थिती मोजली जाणार आहे. 

झपाट्याने घट होत आहेजिल्हाभरात पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, यंदा पुन्हा २ मीटरने घट झालेली आहे. ही आकडेवारी मार्च २०१९ ची आहे. कमी पर्जन्यमानाने भूगर्भात पाणी पातळीत वाढ झालेलीच नाही.-डॉ. पी. एल. साळवे, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, औरंगाबाद विभाग

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ