शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 20:59 IST

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. उपचाराअभावी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ईएसआय प्रशासनातर्फे कामगार रुग्णांसाठी पंढरपुरात ईएसआयसीचे मॉडेल डिस्पेन्सरी उभारले आहे. रुग्णालयाच्या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी खर्च करुन २०१२-१३ मध्ये इमारत बांधण्यात आली. तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या हस्ते २०१५ मध्ये थाटात रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरु झाल्यानंतर अवघ्या एक-दोन वर्षात इमारतीच्या भिंतीच्या तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले. तरीही इमारतीची पडझड अजून सुरुच आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन रुम व ड्रेसिंग रुम मधील सिलींग कोसळले.

ही घटना प्रशासनाने दाबून ठेवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगळवारी काही सुज्ञ कामगारांमुळे ही घटना उघडकीस आली. दोन्ही खोल्यांमधील भिंत कोसळून भिंतीचे सिमेंट गट्टू सिलिंगवर पडल्याने सिलिंगचा काही भाग तुटला आहे. अजूनही कोसळलेले गट्टू सिलिंगवर तसेच पडलेले असून, कोणत्याही क्षणी सिलिंगचा भाग तुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देवून उपचार केले जातात.

त्यामुळे रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथील अग्निशमन यंत्रणा धूळ खात असून, लिफ्टही कायम बंद असते. या भागात विजेचा लपंडाव सुरु असतो. जनरेटरही बंदावस्थेच असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे डॉक्टरांसह रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन बांधलेल्या इमारतीला अवघ्या पाच वर्षांतच उतरती कळा लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विषयी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. व्यंकट यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी कोसळलेल्या भिंतीविषयी वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगितले.इमारतीच्या कामाची तपासणी करावी ..निकृष्ट दर्जाचे बांधकाम काम केल्यामुळेच इमारतीला उतरती कळा लागली आहे. इमारतीच्या कामाची तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी ईएसआय कामगार संघटनेचे प्रकाश जाधव यांनी केली आहे.कामगार रुग्णाच्या जिविताला धोका ..या रुग्णालयात दररोज जवळपास ६०० कामगार रुग्ण येतात. अल्पावधीतच इमारतीची दुरावस्था झाली असून, नुकतीच भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचे संतोष दळवी यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद