शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

औरंगाबादमधील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:32 IST

राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषयमहापालिकेच्या ७२ शाळा असून, त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत.

औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून शहरात माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शाळा सुरू कराव्यात किंवा नाही, असा पेच महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. उद्या यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावी वर्गातील सुमारे ७८ हजार विद्यार्थी घराबाहेर पडणार आहेत. सुमारे साडेतीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील शाळेत येणार आहेत. महपालिकेनेही शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व उपाययोजना खासगी शाळांकडून करून घेण्यासाठी कंबर कसली आहे.

मागील दोन दिवसांत केंद्रीय मुख्याध्यापक, नंतर केंद्रनिहाय मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन खासगी शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत शहरातील १ हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तीन दिवसांपासून शहरात आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरात शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत शनिवारी निर्णय घेणार आहोत. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरात महापालिकेच्या ७२ शाळा असून, त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत. माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांच्या निर्जंतुकीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे, तसेच ४४ शिक्षकांची कोरोना चाचणीदेखील केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSchoolशाळा