शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:32 IST

राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषयमहापालिकेच्या ७२ शाळा असून, त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत.

औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून शहरात माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शाळा सुरू कराव्यात किंवा नाही, असा पेच महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. उद्या यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावी वर्गातील सुमारे ७८ हजार विद्यार्थी घराबाहेर पडणार आहेत. सुमारे साडेतीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील शाळेत येणार आहेत. महपालिकेनेही शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व उपाययोजना खासगी शाळांकडून करून घेण्यासाठी कंबर कसली आहे.

मागील दोन दिवसांत केंद्रीय मुख्याध्यापक, नंतर केंद्रनिहाय मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन खासगी शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत शहरातील १ हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तीन दिवसांपासून शहरात आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरात शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत शनिवारी निर्णय घेणार आहोत. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरात महापालिकेच्या ७२ शाळा असून, त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत. माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांच्या निर्जंतुकीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे, तसेच ४४ शिक्षकांची कोरोना चाचणीदेखील केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSchoolशाळा