शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह नेला थेट बांधकाम भवनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:39 PM

ग्रामस्थांनी आंदोलन करत मृतदेह बांधकाम भवनात नेला 

ठळक मुद्देनिलजगाव ते घारदोन रस्त्यावर रात्री अपघात 

औरंगाबाद : बीड रस्त्यावरील निलजगाव ते घारदोनदरम्यान रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये पडून सोमवारी खोडेगावातील एका ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह थेट औरंगाबादमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणला. ग्रामस्थांनी दीड तास ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली. 

याबाबतची माहिती अशी की, बाबासाहेब भानुदास वीर (४५) हे दुचाकीवरून घरी जात असताना फुलंब्रीवाडी ते घारदोनदरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी खड्ड्यात पडले. याठिकाणी पुलाचे काम चालू आहे. पुलाचे काम चालू असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, पुलाचे काम चालू असल्याबाबत कोणताही फलक अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाही. वीर हे पुलाच्या ठिकाणाहून जात असताना त्यांना रात्रीच्या अंधारात पर्यायी मार्गाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळले. दुचाकी त्यांच्या अंगावर पडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पडलेल्या वीर यांना कुणी पाहिले नाही. सकाळी रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याचे कळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस तिथे धावले. चिकलठाणा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीला घाटीत पाठविला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.

ग्रामस्थ संतप्तवीर यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. वीर यांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी वीर यांचा मृतदेह नंतर थेट अदालत रोडवरील सार्वजनिक बांधकाम भवन येथे आणला. तिथे मुख्य अभियंत्यांच्या दालनासमोर नातेवाईकांनी बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणा देत किमान दीड तास ठिय्या आंदोलन केले. नंतर कार्यकारी अभियंता खं.तु. पाटील यांना नातेवाईकांनी निवेदन सादर केले. रस्त्याचे काम चालू असताना तिथे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या अपघातास ठेकेदार व अधिकारी कारणीभूत असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यापूर्वीही याच रस्त्यावरील खड्ड्यात तीन जण पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याठिकाणी फलक लावण्यासंबंधी आठ दिवसांआधी मागणी करण्यात आल्याचे यावेळी ग्रामस्थ म्हणाले. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा गंभीर प्रसंग ओढावल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळीबाबासाहेब भानुदास वीर हे मेंढ्या चारायला लांझी (वाळूज परिसर) येथे  होते. सोमवारी रोजी रात्री ते मोटारसायकलवरून खोडेगाव येथे घरी जाऊन येतो म्हणून लांझी येथून निघाले. मात्र, ते सकाळपर्यंत घरी आले नाहीत. ते १५ ते २० फूट खोल पुलाच्या खड्ड्यात जाऊन पडले. रात्र असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते तेथेच मृत पावले. घारदोन येथील पोलीस पाटील तात्याराव वीर यांनी अपघाताची माहिती पोलीस ठाण्याला दिली.

बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागेअपघातस्थळी पाहणी करून नि:पक्षपाती चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या वतीने सहायक अधीक्षक अभियंत्यांनी लेखी पत्र दिल्यानंतरच नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, नवनाथ तोगे, नारायण डिघुळे, बालाजी हुलसार, साईनाथ हुलसार, धोंडिबा वीर, काशीनाथ भावले, कारभारी वीर, विष्णू वीर, अर्जुन वीर, विष्णू निवृत्ती वीर, दिगंबर खुणे, एकनाथ वीर, तसेच अप्पासाहेब निर्मळ आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. ४ग्रामस्थ बांधकाम भवनात आल्याचे कळताच खबरदारी म्हणून सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक रोडे, विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार आदींसह पोलिसांचा ताफा बांधकाम विभागात दाखल झाला. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू