शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पतीचे निधन,सहा मुले त्यात पॅरालिसिसचा अटॅक; संकटाच्या काळरात्रीवर ‘मीरा’ची मात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 11:30 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी एका खाणावळीत पाेळ्या करण्याचे कामही केले.

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील अप्रतिम हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या मीराबाई सुरेश जैस्वाल यांच्यावर आयुष्यात अनेक मोठमोठी संकटे येऊनही त्यांनी जिद्दीने पुन्हा उभारी घेतली. पतीचे निधन झाल्यावर मेसवर काम केले. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरही पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी संघर्ष केला. पाच मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांचे विवाह केले. मुलाला डॉक्टर केले. निवृत्तीनंतर आता मुलासोबत आनंदाने राहत आहेत.

फुलंब्री येथील मीराबाईंचे १९६९ मध्ये जळगाव जामोद येथील सुरेश जैस्वाल यांच्यासोबत लग्न झाले. पती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वालसावंगी येथे जि. प. शाळेत शिक्षक होते. मुलांच्या शिक्षणासाठी जैस्वाल दाम्पत्याने सिडको एन-६ भागात घर घेतले. मुली मनपा शाळेत शिक्षण घेत होत्या. दोन मुलींचे लग्न सुरेश जैस्वाल यांनी केले. २००० मध्ये अचानक हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाले तेव्हा मुलगा ऋषिकेश अवघ्या तीन वर्षांचा होता. येथूनच संकटांची मालिका सुरू झाली. गावाकडे पतीची शेती होती, त्यात काहीच वाटा मिळाला नाही. पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून त्यांनी जि. प. कार्यालयाचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका खाणावळीत पाेळ्या करण्याचे कामही त्यांनी केले. त्यातच २००४ मध्ये मीराबाई यांना अर्धांगवायू झाला. मुली, मुलाचे शिक्षण सुरू होते. अशा परिस्थितीत न खचता त्यांनी आपला संघर्ष तीव्र केला. जि. प.मध्ये शिपाई म्हणून अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविली. शहरापासून ३५ किमी लांब कचनेर आरोग्य केंद्रात नेमणूक मिळाली. आजारपणातच रोज अपडाऊन केले. स्नेहा या मुलीला एएलबीपर्यंत शिक्षण दिले. मुलगा ऋषिकेश बीएचएमएस करून डॉक्टर झाला. बजाजनगर येथे त्याने स्वत:चे क्लिनिक सुरू केले. आता त्यांनी सातारा येथे मुलाच्या आग्रहाने रो-हाऊस घेतले.

संकटात धावून जाणारा भाचामीराबाई यांच्या संकटकाळात धावून येणारा म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा दिनेश आणि त्याची बायको सुनीता होय. मुलींसाठी स्थळ पाहण्यापासून लग्नापर्यंत तो खंबीरपणे पाठीशी उभा राहत होता. दिनेशचे आमच्या कुटुंबीयांवर मोठे ऋण असल्याचे त्यांच्या मुलीही पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratriनवरात्री