शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

मरण देता का मरण...राज्यपालांकडे इच्छा मागणी

By admin | Updated: May 16, 2014 00:40 IST

लालखाँ पठाण , गंगापूर सेवानिवृत्तीनंतर अर्धांगवायू आणि कर्करोग झालेल्या एका कर्मचार्‍यास जि. प. प्रशासनाकडून दोन वर्षानंतरही निवृत्तीवेतन मंजूर झालेले नाही.

 लालखाँ पठाण , गंगापूर सेवानिवृत्तीनंतर अर्धांगवायू आणि कर्करोग झालेल्या एका कर्मचार्‍यास जि. प. प्रशासनाकडून दोन वर्षानंतरही निवृत्तीवेतन मंजूर झालेले नाही. जि. प. प्रशासनाच्या या अमानवी धोरणाला कंटाळून येथील वामन विश्वनाथ जाधव या सेवानिवृत्त कर्मचार्‍याने राज्यपालांकडे इच्छामरणास परवानगी द्यावी असा अर्ज सादर केला आहे. गंगापूर येथील वामन जाधव यांची ही करुण कहाणी असून एक वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायू व तद्नंतर लगेच कर्करोगाने ग्रासलेले आहे. १९७८ मध्ये ते प्रथम लघुपाटबंधारे विभाग, गंगापूर येथे हजेरी सहायक म्हणून रुजू झाले होते. यानंतर त्यांनी पैठण, औरंगाबाद, फर्दापूर, पंचायत समिती गंगापूर, खुलताबाद आदी ठिकाणी विविध पदांवर कर्तव्य बजावले. शेवटी ३० नोव्हेंबर २०११ रोजी कन्नड तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करत असताना ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान, याच काळात खुलताबाद येथून वडनेर येथे हजर होण्यासाठी जात असताना त्यांच्या जवळील सेवापुस्तिका प्रवासामध्ये गहाळ झाली. त्यांनी सेवापुस्तिका शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांना सेवापुस्तिका मिळाली नाही. या बाबत त्यांनी वरिष्ठांना कल्पनादेखील दिली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांची पेन्शन योजना मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला; मात्र संबंधित विभागाने नियमाने आपले काम करू असे सांगून त्यांची बोळवण केली. कार्यालयाच्या चकरा मारता-मारता त्यांचा जीव मेटाकुटीस आला. शिवाय दैनंदिन खर्च भागविण्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतानाच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. अर्धांगवायूचे उपचार सुरू असतानाच कर्करोग झाला असल्याचा उलगडा झाला. असाध्य रोगाची लागण झाल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. निदान होण्यासाठी महागडे रुग्णालय व महागड्या औषधीसाठी त्यांनी आपली सर्व जमापुंजी लावली, आता उसनवार करून उपचार सुरू आहेत. सेवापुस्तिका हरवल्याने नवीन सेवापुस्तिका मिळावी यासाठी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करून मागणी केली होती; परंतु वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर यांनी अद्याप त्यांचा अहवाल कार्यालयात सादर सेवा केला नसल्याने त्यांना नवीन सेवापुस्तिकाही मिळू शकली नाही. याबाबत वामन जाधव यांच्या पत्नी आशाबाई जाधव यांनीदेखील जिल्हा परिषद प्रशासनाला चरितार्थ चालविण्यास कुठल्याच प्रकारचे साधन नसून पती दुर्धर आजाराने ग्रासल्याने कुटुंबाला पोसणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीवेतन मिळाले तर आमचे कुटुंब सावरू शकेल अशा आशयाचे पत्र व आजाराबाबतचे रुग्णालयातील रिपोर्ट सादर केले होते. तरीदेखील अद्यापपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाला पाझर फुटला नाही. जाधव कुटुंबीय सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे. वामन जाधव यांनी पेन्शन योजना, जीपीएफ व इतर बाबींची पूर्तता करून मला रक्कम अदा करण्यात यावी. सदर प्रकरणी एक महिना धीर धरून मी प्रशासनाची वाट पाहणार असून महिनाभरात प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही, तर मी १५ जून रोजी कुटुंबियांचा निरोप घेऊन अज्ञातस्थळी जाऊन मृत्यूला कवटाळणार आहे, अशा प्रकारचे पत्र राज्यपाल, अण्णा हजारे, मानवी हक्क आयोग, लोकपाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे. जाधव यांनी तर आता सर्व प्रकाराला कंटाळून ‘इच्छामरणाची’ परवानगी मागून आपली जीवनयात्रा संपविण्याचा विचार केला आहे. सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे उलटली तरी जिल्हा परिषद प्रशासन आपल्या कर्मचार्‍यांची बाजू ऐकू न घेत नसेल तर ती नोकरी काय कामाची, आयुष्यभर मरमर करून त्याचे फळ असे मिळत असेल तर अशा प्रशासनाचा धिक्कार, असे म्हणत जाधव यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहून ते ओक्साबोक्सी रडत होते.