शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दप्तर दिरंगाई ! पीकविमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींचा साचला ढीग ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 16:26 IST

ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांना अद्याप एक छदामही विमा कंपन्यांनी दिलेला नाही.

ठळक मुद्देमराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाचे कडक भाषेत पत्र आल्याचे वृत्तमराठवाड्यात खरीप हंगामातील ३७ लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. विभागातील बाधित ४७ लाखपैकी सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याचे प्रमाण

औरंगाबाद : मराठवाड्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींचा ढीग जिल्हाधिकाऱ्यांच्या दप्तरी साचला आहे. जिल्हा प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कृषी आयुक्तालयाने कडक भाषेत पत्र देऊन त्याचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सूचना मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे वृत्त आहे.

राज्य शासनाने एसडीआरएफमधून (राज्य आपत्ती मदत निधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी सुमारे ३७०० कोटी रुपयांची मदत केली असली तरी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांना अद्याप एक छदामही विमा कंपन्यांनी दिलेला नाही.पीकविमा कंपन्यांच्या हरकतींवर अद्याप जालना, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यांसह विभागातील इतर जिल्ह्यांचाही यात समावेश असल्याचे कळते. मराठवाड्यात खरीप हंगामातील ३७ लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. विभागातील बाधित ४७ लाखपैकी सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याचे प्रमाण आहे. पीकविमा, शेतकरी, राज्य व केंद्र शासन वाटा याची एकंदरीत माहिती अजून गोळा करण्याचे काम महसूल प्रशासन करीत आहे.

एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राला २५८५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट येणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे विम्याच्या यादीतील पिकांसाठी अधिसूचना काढावी लागते. काही जिल्ह्यांत या अधिसूचना निघाल्या आहेत. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत या अधिसूचना निघालेल्या नाहीत. विमा कंपन्या नफेखोर आहेत. त्यामुळे कंपन्या हरकती दाखल करण्याचे धोरण मागील काही वर्षांपासून घेत आहेत. त्यामुळे भरपाईची प्रक्रिया लांबणीवर पडते. या सगळ्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी हरकती निकाली काढणे गरजेचे असते. ही प्रक्रिया वेळेत झाली नाही तर शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वेळेत मिळत नाही.

...तरच लवकर मिळेल विम्याची रक्कमपिकांच्या नुकसानीनंतर विमा कंपन्यांच्या हरकतींवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. कंपन्यांच्या हरकती निकाली न निघाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरकती निकाली निघाल्यास भरपाईची अधिसूचना निघेल, विमा कंपन्यांना हा प्रकार मान्य नसल्याचे कळते. हरकतींचा लवकर निपटारा झाल्यास शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा