शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बजाजनगरात पसरले घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:42 IST

बजाजनगरातील स्वच्छतेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्य रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

वाळूज महानगर : बजाजनगरातील स्वच्छतेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्य रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. परिणामी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील कचºयाचे ढिग पहाता एमआयडीसीत उभारलेल्या खत प्रकल्पाचा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. कचरा कुजून परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

वाळूज महानगरातील बजाजनगर ही मुख्य कामगार वसाहत असून, येथील साफ-सफाई व स्वच्छतेची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. एमआयडीसीने एका खाजगी ठेकेदाराला स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे. संबंधित ठेकेदाराकडून साफ-सफाईकडे लक्ष दिले जात नाही. वेळेवर कचरा संकलन केले जात नाही. शिवाय साचलेला कचराही उचलला जात नाही.

त्यामुळे येथील कचरा प्रश्न गंभीर बनत आहे. नियमित वेळेवर घंटागाडी येत नसल्याने नागरिक घरातील साचलेला कचरा मुख्य रस्त्यावर आणून टाकत आहेत. शिवाय लगतचे व्यावसायिकही रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकत आहेत. येथील महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक, स्मशानभूमी परिसर, इंद्रप्रस्थ कॉलनी आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर जागोजागी कचºयाचे ढिग साचले आहेत.

रामलीला मैदाना समोरील खदान तर कचरा डेपोच बनली आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासाचे प्रमाणही वाढले आहे. याबरोबरच साथीचे आजार जडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Walujवाळूज