शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

औरंगाबादच्या दमडी महालचा समावेश मनपाच्या वारसा यादीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:12 IST

दमडी महालला गतवैभव कसे मिळवून देता येईल, याचे कोणतेच नियोजन मनपाकडे नाही. 

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी  मनपानेच पाडला होता महल आता उरलेत अर्धवट अवशेष 

औरंगाबाद : रस्ता रुंदीकरणात अडसर ठरत असल्याचे कारण दाखवून दोन वर्षांपूर्वी महापालिकेनेच ऐतिहासिक दमडी महालचा काही भाग पाडला. आता महालचे काही अवशेष शिल्लक आहेत. आता या अवशेषाची नोंद शहरातील वारसा स्थळांच्या यादीत करण्यात येणार आहे. दमडी महालला गतवैभव कसे मिळवून देता येईल, याचे कोणतेच नियोजन मनपाकडे नाही. 

शहरातील ऐतिहासिक वास्तूंची सूची पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीत शहरातील १४४ वास्तूंचा ऐतिहासिक वास्तू म्हणून समावेश करण्यात आला होता. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद केली आहे. या निधीतून सात दरवाजांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महमूद दरवाजा, कटकट गेट, जाफरगेट, बारापुल्ला दरवाजा, खिजरी दरवाजा, काळा दरवाजाचा समावेश आहे.  

नहर-ए-अंबरीच्या गोमुखाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे, तसेच दुर्लक्षित वास्तूंना या यादीत समाविष्ट करून सूची पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक वस्तूंविषयी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात येतील. महापालिकेने ७ दरवाजे व गोमुखाचा परिसर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादfundsनिधी